शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हेलिकॉप्टर, छोट्या विमानांचे प्रचारासाठी बुकिंग फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 06:35 IST

लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांना जास्त मागणी असल्याने विविध मतदारसंघांत जाण्यासाठी हवाई प्रवासालाच ते प्राधान्य देत आहेत.

- खलील गिरकर मुंबई : लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांना जास्त मागणी असल्याने विविध मतदारसंघांत जाण्यासाठी हवाई प्रवासालाच ते प्राधान्य देत आहेत. मात्र, राजकीय नेत्यांकडून मागणी जास्त व हेलिकॉप्टर, लहान विमानांची संख्या कमी असल्याने प्रचारासाठी अनेकांवर रस्ते मार्गाने प्रवास करण्याची वेळ आली आहे.देशभरात सुमारे २०० खासगी हेलिकॉप्टर वापरात आहेत. त्यापैकी प्रचारासाठी सुमारे १२५ हेलिकॉप्टर सेवेत आहेत. त्यांचे आरक्षणपूर्वीच झाल्याने आता हेलिकॉप्टर व विमाने मिळवणे अवघड जात आहे. राज्यात सुमारे १८ हेलिकॉप्टरआहेत; त्यांचे आरक्षणही फुल्ल झालेले आहे.एमएबी एव्हिएशनचे मंदार भारदे म्हणाले, एन्ट्री लेव्हल हेलिकॉप्टरचा दर प्रति तास १ लाख रुपये आहे, तर अत्याधुनिक सुविधा असलेल्या हेलिकॉप्टरचा दर तासाला साडेचार लाख रुपयांपर्यंत आहे. हेलिकॉप्टरचा वेग, जास्त केबिन कम्फर्ट अशा विविध सुविधांमुळे हेलिकॉप्टरच्या भाड्यामध्ये वाढ होते. हेलिकॉप्टर व विमाने आरक्षित करण्यामध्ये भाजपचा प्रथम क्रमांक आहे. त्याखालोखाल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी आरक्षण केले आहे.जवळच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमान असा प्राधान्यक्रम असल्याची माहिती एलॉफ्ट एव्हिएशनच्या संचालिका निशा शर्मा यांनी दिली. २६ एप्रिलपर्यंत हेलिकॉप्टरचे आरक्षण फुल्ल झाले असून त्यानंतर राज्याबाहेरील प्रचारासाठी छोटी विमाने आरक्षित करण्यात आलेली आहेत. आमच्या ताफ्यातील ३ हेलिकॉप्टर व ३ विमाने आरक्षित आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट ग्राहकांचे आरक्षण सध्या घेतले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.>ग्रामीण भागात जाण्यासाठी हेलिकॉप्टरला पसंतीहेलिकॉप्टरसोबत प्रचारामध्ये छोट्या विमानांचाही समावेश आहे. छोट्या विमानांचे उड्डाणाचे दर प्रति तास साधारण एक लाख ते साडेचार लाख इतके आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारची८ ते १० छोटी विमाने वापरात आहेत.विमानांचे उड्डाण व लँडिंगसाठीधावपट्टी व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करता तुलनेने तात्पुरते हेलिपॅड उभारणे सहज शक्य असल्याने ग्रामीण भागात जाण्यासाठी नेत्यांचा ओढा हेलिकॉप्टरकडेच असल्याचे भारदे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019MumbaiमुंबईBJPभाजपाcongressकाँग्रेस