शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

"ममतांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात राज्यपाल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 11:47 IST

west Bengal: पश्चिम बंगामध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. तर पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

बिहार निवडणुकीनंतर आता भाजपाने सारे लक्ष पश्चिम बंगालकडे वळविले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच प. बंगालचा दौरा केला. राज्यपाल जगदीप धनखड़ आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद सवश्रूतच आहेत. यातच ममता यांच्या एका मोठ्या मंत्र्याने निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्याने ममता संकटात सापडल्या आहेत. रविवारी भाजपाच्या खासदाराने केलेले वक्तव्य निवडणुकीआधी प. बंगालमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचे संकेत देत आहे. 

भाजपा खासदार सौमित्र खान यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना १४९ चे बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात असे वक्तव्य केले आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर तृणमूलच्या नेत्यांनी भाजपावर लोकशाहीप्रती कोणताच आदर नसल्याचे म्हटले आहे. 

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष खान यांनी जलपाईगुडीमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षात सध्या उलथा पुलथ सुरु आहे. यामुळे त्यांचे सरकार विधानसभेत बहुमतात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे ते म्हणाले. आमदार ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त करत तृणमूल काँग्रेस सोडत आहेत, ते पाहता राज्यपाल लवकरच बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देऊ शकतात, शक्यता अधिक आहे. ममतांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भाजपात येण्यासाठी तयार आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. 

तृणमूलचा पलटवारभाजपाच्या खासदारांना तृणमूलचे खासदार सौगत ऱॉय यांनी उत्तर दिले आहे. भाजपाचे नेत्यांना संविधान आणि त्यातील तरतूदींबाबत काहीही माहिती नसते. खान यांना कसे समजले की, राज्यपाल अशाप्रकारचे पाऊल उचलणार आहेत.? लोकांनी निवडून दिलेल्या सरकारबाबत अशाप्रकारे वागविले जाऊ शकत नाही. तृणमूल काँग्रेसला १४९ नाही तर २१८ एवढे मोठे बहुमत आहे. पश्चिम बंगामध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. तर पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

 

 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. त्यातच गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. पश्चिम बंगालच्याराजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका