शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

"ममतांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात राज्यपाल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 11:47 IST

west Bengal: पश्चिम बंगामध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. तर पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

बिहार निवडणुकीनंतर आता भाजपाने सारे लक्ष पश्चिम बंगालकडे वळविले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच प. बंगालचा दौरा केला. राज्यपाल जगदीप धनखड़ आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद सवश्रूतच आहेत. यातच ममता यांच्या एका मोठ्या मंत्र्याने निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्याने ममता संकटात सापडल्या आहेत. रविवारी भाजपाच्या खासदाराने केलेले वक्तव्य निवडणुकीआधी प. बंगालमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचे संकेत देत आहे. 

भाजपा खासदार सौमित्र खान यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना १४९ चे बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात असे वक्तव्य केले आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर तृणमूलच्या नेत्यांनी भाजपावर लोकशाहीप्रती कोणताच आदर नसल्याचे म्हटले आहे. 

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष खान यांनी जलपाईगुडीमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षात सध्या उलथा पुलथ सुरु आहे. यामुळे त्यांचे सरकार विधानसभेत बहुमतात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे ते म्हणाले. आमदार ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त करत तृणमूल काँग्रेस सोडत आहेत, ते पाहता राज्यपाल लवकरच बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देऊ शकतात, शक्यता अधिक आहे. ममतांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भाजपात येण्यासाठी तयार आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. 

तृणमूलचा पलटवारभाजपाच्या खासदारांना तृणमूलचे खासदार सौगत ऱॉय यांनी उत्तर दिले आहे. भाजपाचे नेत्यांना संविधान आणि त्यातील तरतूदींबाबत काहीही माहिती नसते. खान यांना कसे समजले की, राज्यपाल अशाप्रकारचे पाऊल उचलणार आहेत.? लोकांनी निवडून दिलेल्या सरकारबाबत अशाप्रकारे वागविले जाऊ शकत नाही. तृणमूल काँग्रेसला १४९ नाही तर २१८ एवढे मोठे बहुमत आहे. पश्चिम बंगामध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. तर पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

 

 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. त्यातच गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. पश्चिम बंगालच्याराजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका