शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची सुप्रीम कोर्टात धाव; जाणून घ्या प्रकरण..

By प्रविण मरगळे | Updated: November 18, 2020 08:24 IST

Governor Bhagat Singh Koshyari Approaches Supreme Court News: हायकोर्टाकडून जाहीर झालेल्या अवमान नोटीसमध्ये अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी भगतसिंग कोश्यारी यांनी याचिकेत केली आहे.

ठळक मुद्देसरकारी निवासस्थान तसेच अन्य सुविधांच्या मोबदल्यात थकीत रक्कम ६ महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिलेभगतसिंग कोश्यारी यांच्याकडे घरभाडे आणि अन्य सुविधांसाठीची ४७ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही त्यांनी भरलेले नाहीराज्यपालांना कायदेशीर कारवाईतून सूट देण्याचा मुद्दा त्यांनी याचिकेत घटनेअंतर्गत मांडला आहे.

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.  घरभाडे आणि इतर सुविधांसाठीचे सुमारे ४७ लाख रुपयांचे भाडे थकवल्याने उत्तराखंड हायकोर्टाने महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात अवमानना नोटिस बजावली होती. तसेच या नोटिशीला चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याची सूचना कोर्टाने कोश्यारी यांना केली होती.

कोश्यारी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. माजी मुख्यमंत्र्याकडून सरकारी निवासस्थानाचे बाजारभावाने भाडे आकारण्याच्या उत्तराखंड कोर्टाच्या निर्णयाला त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. हायकोर्टाकडून जाहीर झालेल्या अवमान नोटीसमध्ये अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी भगतसिंग कोश्यारी यांनी याचिकेत केली आहे.

काय आहे प्रकरण?

रुरल लिटिगेशन अँड इंटारइटेल्मेंट केंद्र (रुलक) ने उत्तराखंड हायकोर्टात कोश्यारींच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उत्तराखंड हायकोर्टाने गतवर्षी माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारी निवासस्थान तसेच अन्य सुविधांच्या मोबदल्यात थकीत रक्कम ६ महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र कोश्यारी यांनी कोर्टाच्या आदेशानुसार थकीत भाडे जमा केले नाही. त्यामुळे हायकोर्टाने त्यांच्याविरोधात नोटिस जारी केली होती.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. राज्यपालांना कायदेशीर कारवाईतून सूट देण्याचा मुद्दा त्यांनी याचिकेत घटनेअंतर्गत मांडला आहे. राज्यघटनेच्या कलम ३६१ अन्वये कोर्टाच्या खटल्याद्वारे राज्यपाल यांना देण्यात आलेली सूट फौजदारी अवमानाची नोटीस बजावताना दुर्लक्ष करता येऊ शकते. कोश्यारी म्हणाले की, भाडे बरेच वाढवून निश्चित केले गेले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी आमचं म्हणणं मांडण्याची संधीही दिली नाही. कोश्यारी यांनी ३ मे २०१९ रोजीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला कोर्टात आव्हान दिलं आहे.

राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचे आवाहन केले होते. या पत्रातून कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे राज्यपालांच्या या पत्रावर टीकेची झोड उठली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कोश्यारी यांच्याविरोधात तक्रार केली होती. कुणी आत्मसन्मान असलेली व्यक्ती असती तर तिने राजीनामा दिला असता, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला होता. तर अलीकडेच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांसाठी ठाकरे सरकारनं शिफारस यादी पाठवली आहे. परंतु अद्यापही यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय