शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
5
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
6
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
7
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
8
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
9
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
10
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
11
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
13
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
14
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
15
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
16
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
17
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
18
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
19
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली? राज्यपालांच्या न झालेल्या भेटीची दिवसभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 07:36 IST

milind Narvekar meet Bhagat Singh Koshyari? राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर, वेळच मागण्यात आलेली नव्हती, असे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार, अशी चर्चा गुरुवारी दिवसभर होती. प्रत्यक्षात ही भेट झालीच नाही. राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर, वेळच मागण्यात आलेली नव्हती, असे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले.

‘लोकमत’ने राजभवनशी संपर्क साधला असता कोणतीही भेटीची वेळ राज्यपालांकडे मागण्यात आली नाही, अशी माहिती देण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, सायंकाळी साडेचारच्या सुमारास राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटीसाठी वेळ द्यावी, अशी विनंती केली. आज दिवसभर राज्यपालांचे पूर्वनियोजित पाच कार्यक्रम होते. उद्यापासून तीन दिवस राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर असतील.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी एका पुस्तक प्रकाशनासाठी राजभवनावर गेले होते. यावेळी राज्यपालांशी त्यांनी सुमारे २० मिनिटे चर्चा केली.

गेल्या आठवड्यात आपली राज्यपालांशी नामनियुक्त सदस्यांबाबत चर्चा झाली आणि आम्ही त्यांना पुन्हा भेटणार आहोत, असा दावा अजित पवार यांनी पुण्यात केला होता. मात्र, या विषयावर चर्चा झाल्याचाही राजभवनने इन्कार केला.

आता राज्यपालांची भेट १ सप्टेंबरनंतरच शक्यभेटीची वेळ घेण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर रात्री राजभवनवर गेले. ‘माझे पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि शिष्टमंडळ येणार असल्याची पूर्वकल्पना दिलेली नव्हती. लगेच वेळ देता येणे शक्य नाही’ असे राज्यपालांनी नार्वेकर यांना सांगितले. याबाबतच्या बातम्यांवरही राज्यपालांनी आश्चर्य व्यक्त केले. आता १ सप्टेंबरला राज्यपाल मुंबईत परतल्यानंतरच भेट होईल, असे मानले जाते.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले