शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:03 IST

शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही.आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे.सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत.

गाजियाबाद - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे मंगळवारी केंद्रीय कृषी विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यूपी गेट इथं पोहचले. त्यावेळी चौटाला यांनी भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहण्याचं आश्वासन दिलं. त्याचसोबत संपूर्ण देशभरात इंडियन नॅशनल लोकदल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करेल असंही ओम प्रकाश चौटाला यांनी इशारा दिला.

यावेळी बोलताना ओम प्रकाश चौटाला म्हणाले की, आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे. आज पूर्ण देश कृषी विधेयकाच्या विरोधात उभा आहे. शेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत. केंद्र सरकार अल्पमतात येईल. सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील असा दावा त्यांनी केला.

तर शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा. ओमप्रकाश चौटाला यांच्या पाठिंब्यानं नवी उर्जा मिळाली आहे. यूपी गेटवर किसान शहीद स्मृती दिवस साजरा केला जाईल. २१ जुलै १९८० मध्ये कर्नाटकात फायरींग झाली होती त्यात २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृती जागवण्यात येतील असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले.

कोण आहेत ओम प्रकाश चौटाला?

ओम प्रकाश चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. २ जुलै रोजी तिहाड जेलमधून त्यांची सुटका झाली. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौटाला यांना १० वर्षाची शिक्षा झाली होती.

...तर देशात युद्ध होईल

शेतकरी तर परत जाणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. ५ सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. सरकारने नाही ऐकलं तर देशात युद्ध होईल असं वाटतंय" असे राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकार