शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:03 IST

शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही.आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे.सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत.

गाजियाबाद - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे मंगळवारी केंद्रीय कृषी विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यूपी गेट इथं पोहचले. त्यावेळी चौटाला यांनी भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहण्याचं आश्वासन दिलं. त्याचसोबत संपूर्ण देशभरात इंडियन नॅशनल लोकदल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करेल असंही ओम प्रकाश चौटाला यांनी इशारा दिला.

यावेळी बोलताना ओम प्रकाश चौटाला म्हणाले की, आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे. आज पूर्ण देश कृषी विधेयकाच्या विरोधात उभा आहे. शेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत. केंद्र सरकार अल्पमतात येईल. सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील असा दावा त्यांनी केला.

तर शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा. ओमप्रकाश चौटाला यांच्या पाठिंब्यानं नवी उर्जा मिळाली आहे. यूपी गेटवर किसान शहीद स्मृती दिवस साजरा केला जाईल. २१ जुलै १९८० मध्ये कर्नाटकात फायरींग झाली होती त्यात २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृती जागवण्यात येतील असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले.

कोण आहेत ओम प्रकाश चौटाला?

ओम प्रकाश चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. २ जुलै रोजी तिहाड जेलमधून त्यांची सुटका झाली. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौटाला यांना १० वर्षाची शिक्षा झाली होती.

...तर देशात युद्ध होईल

शेतकरी तर परत जाणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. ५ सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. सरकारने नाही ऐकलं तर देशात युद्ध होईल असं वाटतंय" असे राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकार