शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

गोपाळ शेट्टी सातवी, ऊर्मिलाकडेही पदवी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 01:53 IST

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे.

- सचिन लुंगसे मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र हे दोन्ही उमेदवार पदवीधर नाहीत. शेट्टी यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. तर मातोंडकर यांचे शिक्षण एसवायबीएपर्यंत झाले आहे. उर्वरित उमेदवारांपैकी एक उमेदवार पीचडी, एक उमेदवार एमबीए आणि एक उमेदवार टेक्निकल क्षेत्रातील शिक्षण घेतलेला आहे.लोकसभा असो, विधानसभा असो, पालिकांसारख्या निवडणुका असो. अशा निवडणुकांमध्ये आपल्या मतदारसंघातील उमेदवार उच्च शिक्षित असावा, अशी आशा मतदारांना असते.मात्र एखाददुसरा उमेदवार वगळला तर उर्वरित उमेदवारांचे शिक्षण एसएससीच्या पुढे जात नाही. परिणामी मतदारांचा हिरमोड होतो. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून शेट्टी आणि मातोंडकर यांच्यातच प्रमुख लढत असून, हे दोघेही उच्च शिक्षित नसले तरी ऊर्मिला यांना बॉलीवूडचे वलय आहे आणि शेट्टी कार्यकर्त्यापासून खासदार झाले आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.>हे आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वास्तवउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात तीन उमेदवार पदव्युत्तर आहेत. दोघांकडे पदवी आहे. बारावी चार जण आहेत. दहावी एक जण आहे. वाणिज्य, कला, पीचडी आणि एमबीएचेही उमेदवार येथे आहेत. ज्या दोघांमध्ये चुरस आहे त्या दोन उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराकडे पदवी नाही; हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वास्तव आहे.

उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीजग एकविसाव्या शतकात जगत असताना आपल्या देशातील आपले प्रतिनिधी किमान शिक्षित असावेत, अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. मात्र राजकारणाचा टेÑंड पाहता, राजकारणातील टीका पाहता; राजकीय क्षेत्रात उच्च शिक्षित तरुण उतरू पाहत नाहीत, अशी टीका सातत्याने होते. मात्र तरीही काही मतदारसंघांतून उच्च शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जात असले तरीदेखील नव्याने राजकारणात येत असलेली पिढी उच्च शिक्षित असावी, अशी अपेक्षा मतदारांना असते.
>मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?पदवीधर असावाजनतेच्या विकासाची ब्लू प्रिंट त्याच्याकडे असावी. संसदेमध्ये अशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानेदेश महासत्ता होत नसून बेरोजगारीमुळे अधोगतीकडे वाटचाल होते. लोकप्रतिनिधी किमान पदवीधर असावा.- सुरेश वाघमारेअर्थकारण समजावेकिमान पदवीधर असावा. त्याला देशाचे अर्थकारण समजावे. नोकरी, अर्थकारण याबाबत त्याचा अभ्यास असावा. दिल्लीमध्ये बोलताना त्याने देशाच्या प्रश्नांवर बोलावे. यापैकी काहीच नसेल तर देशाचे, नागरिकांचे नुकसान होते. परिणामी शिक्षित उमेदवारांना संधी द्यावी.- मंथन पाटीलकिमान शिक्षण असावेखासदार हे देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यांना इंग्रजीसोबतच हिंदी आणि स्थानिक भाषा आलीच पाहिजे. किमान शिक्षण असावे. आर्थिक प्रश्नांची जाण असावी. महत्त्वाचे म्हणजे तो किमान पदवीधर असावा. त्याला सामाजिक प्रश्नांची जाण असावी.- विनोद घोलप

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरGopal Shettyगोपाळ शेट्टीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-north-pcमुंबई उत्तर