शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

विरोधकांची आपसात आघाडी; भाजपाची मात्र जनतेशी युती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:23 IST

काँग्रेससह देशभरातील २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्यंत कडवट शब्दांत खिल्ली उडविली.

नवी दिल्ली : काँग्रेससह देशभरातील २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्यंत कडवट शब्दांत खिल्ली उडविली. ‘भ्रष्ट, घोटाळेबाज, नकारात्मक मानसिकता असलेले आणि देशाला अस्थिरतेशिवाय दुसरे काहीही न दिलेले’ स्वार्थी लोक ’महागठबंधन’च्या नावाखाली एकत्र येत आहेत, असा जोरदार पलटवार त्यांनी केला.महाष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा आणि सातारा तसेच गोव्यातील दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघांमधील भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, विरोधी पक्ष आपसात आघाडी करण्याच्या गोष्टी करत असले तरी आपल्या पक्षाची (भाजपा) देशाच्या १२५ कोटी जनतेशी घट्ट युती आहे. या दोन्हींपैकी कोणती युती अधिक भक्कम आहे, असे तुम्हाला वाटते, असे मोदींनी कार्यकर्त्यांना विचारले.कोलकत्यामधील विरोधकांच्या मेळाव्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, त्यांच्याकडे धनशक्ती आहे तर आमच्याकडे जनशक्ती आहे. कोलकत्यात व्यासपीठावर जे जमले होते ते एक तर वजनदार मंडळींची मुले होती किंवा ते आपल्या मुलाबाळांचे बस्तान बसवू पाहात होते. ज्या पक्षांमध्ये नावालाही अंतर्गत लोकशाही नाही तेच आज लोकशाहीच्या नावाने गळा काढून लोकांची दिशाभूल करीत आहेत, असेही ते म्हणाले. मतदानयंत्रांना ‘चोर मशिन’ असे संबोधून विरोधी नेत्यांनी आगामी निवडणूक जुन्या पद्धतीप्रमाणे मतपत्रिकेने घेण्याची मागणी केली होती. त्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने ही मंडळी आता मतदानयंत्राला ‘व्हिलन’ ठरवू पाहात आहेत. ते म्हणाले की, आपण निवडणूक जिंकावी असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे. पण नेतेमंडळी लोकांना मूर्ख समजून गृहित धरू लागतात तेव्हा तो मोठा चिंतेचा विषय ठरतो.सरकारने साडेचार वर्षांत लोककल्याण व विकासाच्या विविध योजना राबवून भारताला जगात कसे मानाचे स्थान मिळवून दिले, याचा पाढा मोदींनी वाचला. कार्यकर्त्यांनी हे काम लोकांपर्यंत पोहोचवून विरोधकांचा अपप्रचार खोडून काढावा, असे त्यांनी आवाहन केले.>तेच बोफोर्सवर बोलू लागलेज्या व्यासपीठावरून हे लोक देश आणि लोकशाही वाचविण्याच्या बाता करीत होते त्याच व्यासपीठावरून एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करून दिली. शेवटी सत्य लपत नाही, हेच खरे! - नरेंद्र मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९