शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची आपसात आघाडी; भाजपाची मात्र जनतेशी युती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:23 IST

काँग्रेससह देशभरातील २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्यंत कडवट शब्दांत खिल्ली उडविली.

नवी दिल्ली : काँग्रेससह देशभरातील २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्यंत कडवट शब्दांत खिल्ली उडविली. ‘भ्रष्ट, घोटाळेबाज, नकारात्मक मानसिकता असलेले आणि देशाला अस्थिरतेशिवाय दुसरे काहीही न दिलेले’ स्वार्थी लोक ’महागठबंधन’च्या नावाखाली एकत्र येत आहेत, असा जोरदार पलटवार त्यांनी केला.महाष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा आणि सातारा तसेच गोव्यातील दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघांमधील भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, विरोधी पक्ष आपसात आघाडी करण्याच्या गोष्टी करत असले तरी आपल्या पक्षाची (भाजपा) देशाच्या १२५ कोटी जनतेशी घट्ट युती आहे. या दोन्हींपैकी कोणती युती अधिक भक्कम आहे, असे तुम्हाला वाटते, असे मोदींनी कार्यकर्त्यांना विचारले.कोलकत्यामधील विरोधकांच्या मेळाव्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, त्यांच्याकडे धनशक्ती आहे तर आमच्याकडे जनशक्ती आहे. कोलकत्यात व्यासपीठावर जे जमले होते ते एक तर वजनदार मंडळींची मुले होती किंवा ते आपल्या मुलाबाळांचे बस्तान बसवू पाहात होते. ज्या पक्षांमध्ये नावालाही अंतर्गत लोकशाही नाही तेच आज लोकशाहीच्या नावाने गळा काढून लोकांची दिशाभूल करीत आहेत, असेही ते म्हणाले. मतदानयंत्रांना ‘चोर मशिन’ असे संबोधून विरोधी नेत्यांनी आगामी निवडणूक जुन्या पद्धतीप्रमाणे मतपत्रिकेने घेण्याची मागणी केली होती. त्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने ही मंडळी आता मतदानयंत्राला ‘व्हिलन’ ठरवू पाहात आहेत. ते म्हणाले की, आपण निवडणूक जिंकावी असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे. पण नेतेमंडळी लोकांना मूर्ख समजून गृहित धरू लागतात तेव्हा तो मोठा चिंतेचा विषय ठरतो.सरकारने साडेचार वर्षांत लोककल्याण व विकासाच्या विविध योजना राबवून भारताला जगात कसे मानाचे स्थान मिळवून दिले, याचा पाढा मोदींनी वाचला. कार्यकर्त्यांनी हे काम लोकांपर्यंत पोहोचवून विरोधकांचा अपप्रचार खोडून काढावा, असे त्यांनी आवाहन केले.>तेच बोफोर्सवर बोलू लागलेज्या व्यासपीठावरून हे लोक देश आणि लोकशाही वाचविण्याच्या बाता करीत होते त्याच व्यासपीठावरून एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करून दिली. शेवटी सत्य लपत नाही, हेच खरे! - नरेंद्र मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९