शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

E Rajender: तेलंगणचे माजी आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांचा भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांशी होता वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 16:22 IST

E Rajender: तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांशी काही कारणास्तव नाराजी आणि नंतर वाद झाल्यामुळे तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणचे माजी आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली: तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांशी काही कारणास्तव नाराजी आणि नंतर वाद झाल्यामुळे तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणचे माजी आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत ई. राजेंद्र यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. (former Telangana minister E Rajender joins BJP after quitting as trs mla)

ई. राजेंद्र यांच्याविरोधात काही तक्रारी आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी राजेंद्र यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांनी लगेचच राजेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. 

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

तेलंगणाच्याराजकारणा महत्त्वाचे स्थान

भाजप पक्षात ई. राजेंद्र यांचे स्वागत करताना केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तेलंगणच्या राजकारणात ई. राजेंद्र यांना महत्त्वाचे स्थान आहे. तेलंगणात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार बनवेल, असा विश्वास प्रधान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. हुजुराबाद विधानसभा मतदारसंघातून ई. राजेंद्र आमदार होते. राजेंद्र यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी कमळ हाती घेतले. 

“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

दरम्यान, राजेंद्र यांच्या कुटुंबातील सदस्यांची मालकी असलेल्या कंपनीकडून राज्यातील जमिनींवर कब्जा केल्याची तक्रार करण्यात आली होती. पक्षाध्यक्षांना भेटून मला राजीनामा द्यायचा होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पक्ष सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला, अशी प्रतिक्रिया ई. राजेंद्र यांनी दिली. अनेकांनी राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मतदारसंघ आणि तेलंगणातील नागरिकांच्या आत्मसन्मानासाठी राजीनामा द्यावा लागला, असे राजेंद्र यांनी नमूद केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाTelanganaतेलंगणा