शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

E Rajender: तेलंगणचे माजी आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांचा भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांशी होता वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 16:22 IST

E Rajender: तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांशी काही कारणास्तव नाराजी आणि नंतर वाद झाल्यामुळे तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणचे माजी आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली: तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांशी काही कारणास्तव नाराजी आणि नंतर वाद झाल्यामुळे तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणचे माजी आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत ई. राजेंद्र यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. (former Telangana minister E Rajender joins BJP after quitting as trs mla)

ई. राजेंद्र यांच्याविरोधात काही तक्रारी आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी राजेंद्र यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांनी लगेचच राजेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. 

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

तेलंगणाच्याराजकारणा महत्त्वाचे स्थान

भाजप पक्षात ई. राजेंद्र यांचे स्वागत करताना केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तेलंगणच्या राजकारणात ई. राजेंद्र यांना महत्त्वाचे स्थान आहे. तेलंगणात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार बनवेल, असा विश्वास प्रधान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. हुजुराबाद विधानसभा मतदारसंघातून ई. राजेंद्र आमदार होते. राजेंद्र यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी कमळ हाती घेतले. 

“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

दरम्यान, राजेंद्र यांच्या कुटुंबातील सदस्यांची मालकी असलेल्या कंपनीकडून राज्यातील जमिनींवर कब्जा केल्याची तक्रार करण्यात आली होती. पक्षाध्यक्षांना भेटून मला राजीनामा द्यायचा होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पक्ष सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला, अशी प्रतिक्रिया ई. राजेंद्र यांनी दिली. अनेकांनी राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मतदारसंघ आणि तेलंगणातील नागरिकांच्या आत्मसन्मानासाठी राजीनामा द्यावा लागला, असे राजेंद्र यांनी नमूद केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाTelanganaतेलंगणा