शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 15:03 IST

Cabinet Expansion: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारावरून अजूनही टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय कॅबिनेट विस्तारावर पुन्हा एकदा टीकाभाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच कॅबिनेट मंत्रिपदमाजी IAS अधिकाऱ्याची जोरदार टीका

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या १२ मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. मात्र, यावरून अजूनही टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले, अशी टीका एका माजी IAS अधिकाऱ्याने मोदी सरकारवर केली आहे. (former ias surya pratap singh says accused for corruption by bjp is now in modi cabinet)

माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी एक ट्विट करत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे. यामध्ये भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांनाच आता मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचे सूर्यप्रताप सिंह यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेकांनी विविध स्तरांतून टीका केली आहे. तर, काही दिग्गज मंत्र्यांचे घेतलेले राजीनामे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले. 

“वसुंधरा राजेंना कोणी रोखू शकत नाही, ३ महिन्यांत टेक ओव्हर करणार”; ऑडिओ व्हायरल

मास्टरस्ट्रोक

ज्या नारायण राणेंवर भाजपने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणात सामील असल्याचा आरोप केला होता. तेच आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये आहेत आणि MSME सारख्या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. मास्टरस्ट्रोक, असे ट्विट सूर्यप्रताप सिंह यांनी केले आहे. 

नारायण राणे कॅबिनेट मंत्री

मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या चार महाराष्ट्रातील शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये भाजप नेते नारायण राणे यांना कोणते खाते मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नारायण राणे यांनी सर्वांत आधी मंत्रिपदाची शपथ घेतली. नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर यावरून महाराष्ट्रातही अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना नेत्यांनी यासंदर्भात नारायण राणे, भाजप आणि मोदी सरकारवर अप्रत्यक्ष किंवा थेट टीका केली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. 

“डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनीही खांदेपालटावर टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेणे म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे रवीश कुमार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कोणतीही तयारी केली नव्हती. अन्यथा लाखोंच्या संख्येत नागरिक मृत्युमुखी पडले नसते. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी स्वतः निवडणूक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. लोकांना मरण्यासाठी सोडून दिले होते, अशी बोचरी टीका रवीश कुमार यांनी केली.  

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारCentral Governmentकेंद्र सरकारNarayan Raneनारायण राणेPoliticsराजकारणBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी