शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार?

By मोरेश्वर येरम | Updated: December 14, 2020 15:32 IST

काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देकमलनाथ यांनी राजकीय सन्यास घेण्याचे दिले संकेतछिंदवाडा या आपल्या बालेकिल्ल्यात एका कार्यक्रमात कमलनाथ यांचं विधानकमलनाथ यांच्या राजकीय सन्यायामुळे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला बसू शकतो मोठा धक्का

छिंदवाडामध्य प्रदेशात सरकार गमावल्यावर आणि पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठं विधान केलंय. छिंदवाडा येथील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना कमलनाथ यांनी राजकारणाला 'रामराम' करण्याचे संकेत दिले आहेत. 

"मला आता आरामाची गरज आहे. मी आतापर्यंत खूप प्रगती केलीय", असं कमलनाथ म्हणाले. काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कमलनाथ केवळ राजकीय पद सोडण्याच्या नव्हे, तर राजकारणातूनच सन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कमलनाथ सध्या त्याच्या मुलासह छिंदवाडाच्या दौऱ्यावर आहेत. छिंदवाडा कमलनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. 

कमलनाथ हे मध्य प्रदेश विधानसभेत विरोधीपक्ष नेत्यासह काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष देखील आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर काँग्रेसमध्येच कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. चुकीचे तिकीट वाटप, कमकुवत उमेदवार आणि चुकीची रणनिती आखल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. 

आधी सरकार पडलं मग पोटनिवडणुकीतही सपशेल पराभवमध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेरीस ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरुन कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. काही काळाने ज्योतिरादित्य यांनी भाजपची वाट धरली आणि काँग्रेसला रामराम ठोकला. 

ज्योतिरादित्य यांच्या जाण्याने मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता गेली. ज्योतिरादित्य समर्थक आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि कमलनाथ सरकार पडलं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस