शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पाच वर्षात गणेश नाईकांनी राष्ट्रवादी खड्यात घातली, जितेंद्र आव्हाड झाले भाऊक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:24 IST

राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय  सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. पाच वर्षात नाईक यांनी पक्षाची वाट लावली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देपाच वर्षापूर्वीच नाईकांना पक्ष सोडायचा होतापक्षाने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही

ठाणे - गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार हे २०१४ मध्येच ठरले होते. या संदर्भात मी वारंवार पक्षाला सांगत होतो, मात्र पक्षाने नेहमी नाईकांना वरची बाजू दिली. परंतु मागील पाच वर्षात नाईकांनी राष्ट्रवादी संपवली असा आणि आज पक्ष अडचणीत असतांना पक्षाला उभारी देण्याऐवजी ते आपला स्वार्थ साधण्याचे काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय  सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही पक्ष उभा करु आणि त्याची सुरवात नवी मुंबईतूनच करु असा विश्वास व्यक्त करीत आव्हाड भाऊक झाले.मागील काही दिवसापासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. त्यानंतर मंगळवारी संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिला आणि सुरु असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. यावर मात्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली असून नाईकांच्या या निर्णयाविरोधात ते भाऊक झाल्याचे दिसून आले. गणेश नाईक यांनी पध्दतशीरपणे राष्ट्रवादी संपवली असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात मी वारंवार पक्षाला याची माहिती देत होतो, मात्र माझे दुर्देव असे की माझ्यावर किंवा माझ्या बोलण्यावर पक्षाने सुध्दा विश्वास ठेवला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उलट नाईक यांना नेहमी वरची बाजू पक्षाने दिल्याचेही त्यांनी सांगितले. २०१४ मध्येच नाईक हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. परंतु साहेबांनी नाईक हे आपले बंधुतुल्य सहकारी असल्याचे सांगत ते कधीही गद्दारी करणार नाहीत, असे सांगत होते. मागील पाच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला खड्यात घालण्याचे काम केले. कल्याण डोंबिवलीत सत्ता असतांना आज त्याठिकाणी एकही नगरसेवक नाही, हीच परिस्थिती भिवंडी आणि मिराभाईंदरमध्येही होती. या सर्वांचे नेतृत्व कोण करीत होते, तर ते नाईकच होते. घरी बसून पक्ष चालत नाही, हे त्यांना समजायला हवे होते. मात्र राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच त्यांनी उचलला होता असा आरोपही त्यांनी केला.स्वाभीमानाच्या गप्पा मारणाऱ्या गणेश नाईक यांच्या विरोधात मंदा म्हात्रे वाट्टेल ते बोलत आहेत. भाजपचे अध्यक्ष नाईक यांना आम्ही स्विकारणा नाही असे बोलत आहेत. असे असतांनाही आता कुठे गेला नाईकांचा स्वाभीमान असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीने नाईक कुटुंबाला अख्खी नवी मुंबई दिली होती. सर्व महत्वाची पदे त्यांच्या घरात होती, असे असतांनाही त्यांनी गद्दारी केली. नवी मुंबईचा विकास झाला हे मान्य जरी केले तरी त्यात नाईकांनी आपल्या घराच्यांचाच विकास अधिक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मला हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत होते. मात्र पक्षाकडूनच याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. मात्र आता हा पक्ष पुन्हा एकदा उभा करु आणि त्याची सुरवात नवीमुंबईतूनच करु असा विश्वास आव्हाडांनी शेवटी बोलतांना व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड