शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

'देशात पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत'; सोनिया गांधी कडाडल्या

By मोरेश्वर येरम | Updated: January 3, 2021 18:47 IST

देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही.

ठळक मुद्देसोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोलकृषी कायद्यांवरुन सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सुनावलंपंतप्रधान मोदी भावनाशून्य असल्याची केली टीका

नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आलंय की ज्यांना देशाच्या अन्नदात्याचं दु:ख कळत नाही", असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला आहे. 

देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही. शेतकरी आंदोलक केंद्राच्या जाचक कायद्यांसमोर अजिबात झुकणार नाहीत, असं सोनिया यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

"अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने गर्विष्ठपणा सोडून तात्काळ कृषी कायदे कोणत्याही अटीविना रद्द करावेत आणि कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. हाच खरा राजधर्म ठरेल आणि ज्या शेतकऱ्यांनी यासाठी बलिदान दिलं त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल", असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. 

लोकशाही म्हणजे देशातील नागरिकांच्या भावनांचा सन्मान करणे आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करणे असा होतो, हे मोदी सरकारने लक्षात घ्यायला हवं असा खोचक सल्ला देखील सोनिया यांनी यावेळी दिला. 

मोदी सरकार भावनाशून्यकृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ५० हून अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर अजूनही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यावरुनही सोनिया यांनी मोदींवर टीका केली. 

"भाजप सरकार असो वा पंतप्रधान मोदी हे भावनाशून्य असून आतापर्यंत शेतकऱ्यांना प्राण गमावावे लागले आहेत. त्यावर चकार शब्द देखील यांनी काढला नाही. शेतकरी आंदोलनात प्राण गमवावा लागलेल्या सर्व शेतकरी बांधवांना मी आदरांजली वाहते आणि त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून सावरण्यासाठी शक्ती लाभो अशी प्रार्थना करते", असं सोनिया म्हणाल्या.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपcongressकाँग्रेस