शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
2
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
3
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
4
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
5
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
6
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
7
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
8
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
9
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
10
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
11
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
12
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
13
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
14
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
15
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
16
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
17
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
18
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
19
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
20
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?

'देशात पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत'; सोनिया गांधी कडाडल्या

By मोरेश्वर येरम | Updated: January 3, 2021 18:47 IST

देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही.

ठळक मुद्देसोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोलकृषी कायद्यांवरुन सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सुनावलंपंतप्रधान मोदी भावनाशून्य असल्याची केली टीका

नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आलंय की ज्यांना देशाच्या अन्नदात्याचं दु:ख कळत नाही", असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला आहे. 

देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही. शेतकरी आंदोलक केंद्राच्या जाचक कायद्यांसमोर अजिबात झुकणार नाहीत, असं सोनिया यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

"अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने गर्विष्ठपणा सोडून तात्काळ कृषी कायदे कोणत्याही अटीविना रद्द करावेत आणि कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. हाच खरा राजधर्म ठरेल आणि ज्या शेतकऱ्यांनी यासाठी बलिदान दिलं त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल", असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. 

लोकशाही म्हणजे देशातील नागरिकांच्या भावनांचा सन्मान करणे आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करणे असा होतो, हे मोदी सरकारने लक्षात घ्यायला हवं असा खोचक सल्ला देखील सोनिया यांनी यावेळी दिला. 

मोदी सरकार भावनाशून्यकृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ५० हून अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर अजूनही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यावरुनही सोनिया यांनी मोदींवर टीका केली. 

"भाजप सरकार असो वा पंतप्रधान मोदी हे भावनाशून्य असून आतापर्यंत शेतकऱ्यांना प्राण गमावावे लागले आहेत. त्यावर चकार शब्द देखील यांनी काढला नाही. शेतकरी आंदोलनात प्राण गमवावा लागलेल्या सर्व शेतकरी बांधवांना मी आदरांजली वाहते आणि त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून सावरण्यासाठी शक्ती लाभो अशी प्रार्थना करते", असं सोनिया म्हणाल्या.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपcongressकाँग्रेस