शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

कटप्पानं बाहुबलीला मारलं याची सगळ्यांनाच माहिती; एकनाथ खडसेंना शिवसेनेत येण्याची ‘फिल्मी ऑफर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 11:44 IST

एकनाथ खडसे भाजपाचे बाहुबली होते, पण त्यांना कटप्पानं मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांचा बिसमिल्लाह केला असं शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

ठळक मुद्देएकनाथ खडसे हे शिवसेनेत आले तर आनंद होईल. एकनाथ खडसे फक्त बोलतात पण ते निर्णय घेत नाहीत.शिवसेनेत आले तर एकनाथ खडसेंचे भविष्य उज्ज्वल होईल - अब्दुल सत्तार

मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसे यांची पक्षातील नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. खडसेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेभाजपा सोडणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात पुन्हा उधाण आलं आहे. यातच शिवसेना मंत्र्यांनी खडसेंना पक्षात येण्याची फिल्मी स्टाईलनं ऑफर दिली आहे.

याबाबत शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, एकनाथ खडसे हे शिवसेनेत आले तर आनंद होईल. शिवसेनेत आले तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. ओबीसी समाजाला घेऊन खडसेंनी शिवसेनेत यावं, आम्ही उद्धव ठाकरेंशी बोलू. एकनाथ खडसे फक्त बोलतात पण ते निर्णय घेत नाहीत. तोंडातून बोलण्याऐवजी त्यावर अंमलबजावणी करावी. एकनाथ खडसे भाजपाचे बाहुबली होते, पण त्यांना कटप्पानं मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांचा बिसमिल्लाह केला असं ते म्हणाले.

तर राज्याच्या भाजपा वाढीत एकनाथ खडसेंचे योगदान आहे. राजकीय दृष्टीने काही निर्णय घ्यावे लागतात, कधी कोणी मागे राहतं कधी कोणी पुढे जातं, राज्यातील अनेक नेत्यांना प्रसंग पाहून पुढे पाठवलं जातं, कधी माघार घ्यावी लागते. परंतु त्यांची नाराजी असेल ती आम्ही पक्षात एकत्र बसून सोडवू अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे. खडसे पुढे म्हणाले की, मला मंत्री मंडळातून काढले, आमदारकीचे तिकीट नाकारले, याचे मला कोणतेही दु:ख नाही. परंतु विविध खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट व पक्षांतर्गत आप्तस्वकियांनी केलेले बदनामीचे षडयंत्र जिव्हारी लागले आहे. आतापर्यंत माझ्याकडे या कटकारस्थानाचे पुरावे नव्हते आता पुरावे जमा झाले आहेत. त्यामुळे ते मी जनतेसमोर आणणार आहे.

देवेंद्रजी अजितदादांवर टीका करूच शकत नाहीत

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करूच शकत नाहीत. कारण त्यांनी आपले सर्व सत्व-तत्व सोडून त्यांच्यासोबत तीन दिवस संसार केला आहे. त्यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. यासाऱ्यात त्यांनी नैतिकता घालविली आहे. त्यामुळे ते अजितदादा यांच्यावर टीका करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.सर्व कटकारस्थानाचे पुरावे मिळाले आहेत. अद्याप तरी हा प्रश्न पक्षाअंतर्गत आहे. याबाबत वरिष्ठांना भेटलो आहे. आता पुरावे ही देणार आहे. कारवाई झाली नाही तर पुढची दिशा ठरवू असं मत एकनाथ खडसेंनी मांडले आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAbdul Sattarअब्दुल सत्तारraosaheb danveरावसाहेब दानवे