शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कटप्पानं बाहुबलीला मारलं याची सगळ्यांनाच माहिती; एकनाथ खडसेंना शिवसेनेत येण्याची ‘फिल्मी ऑफर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 11:44 IST

एकनाथ खडसे भाजपाचे बाहुबली होते, पण त्यांना कटप्पानं मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांचा बिसमिल्लाह केला असं शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

ठळक मुद्देएकनाथ खडसे हे शिवसेनेत आले तर आनंद होईल. एकनाथ खडसे फक्त बोलतात पण ते निर्णय घेत नाहीत.शिवसेनेत आले तर एकनाथ खडसेंचे भविष्य उज्ज्वल होईल - अब्दुल सत्तार

मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसे यांची पक्षातील नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. खडसेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेभाजपा सोडणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात पुन्हा उधाण आलं आहे. यातच शिवसेना मंत्र्यांनी खडसेंना पक्षात येण्याची फिल्मी स्टाईलनं ऑफर दिली आहे.

याबाबत शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, एकनाथ खडसे हे शिवसेनेत आले तर आनंद होईल. शिवसेनेत आले तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. ओबीसी समाजाला घेऊन खडसेंनी शिवसेनेत यावं, आम्ही उद्धव ठाकरेंशी बोलू. एकनाथ खडसे फक्त बोलतात पण ते निर्णय घेत नाहीत. तोंडातून बोलण्याऐवजी त्यावर अंमलबजावणी करावी. एकनाथ खडसे भाजपाचे बाहुबली होते, पण त्यांना कटप्पानं मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांचा बिसमिल्लाह केला असं ते म्हणाले.

तर राज्याच्या भाजपा वाढीत एकनाथ खडसेंचे योगदान आहे. राजकीय दृष्टीने काही निर्णय घ्यावे लागतात, कधी कोणी मागे राहतं कधी कोणी पुढे जातं, राज्यातील अनेक नेत्यांना प्रसंग पाहून पुढे पाठवलं जातं, कधी माघार घ्यावी लागते. परंतु त्यांची नाराजी असेल ती आम्ही पक्षात एकत्र बसून सोडवू अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे. खडसे पुढे म्हणाले की, मला मंत्री मंडळातून काढले, आमदारकीचे तिकीट नाकारले, याचे मला कोणतेही दु:ख नाही. परंतु विविध खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट व पक्षांतर्गत आप्तस्वकियांनी केलेले बदनामीचे षडयंत्र जिव्हारी लागले आहे. आतापर्यंत माझ्याकडे या कटकारस्थानाचे पुरावे नव्हते आता पुरावे जमा झाले आहेत. त्यामुळे ते मी जनतेसमोर आणणार आहे.

देवेंद्रजी अजितदादांवर टीका करूच शकत नाहीत

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करूच शकत नाहीत. कारण त्यांनी आपले सर्व सत्व-तत्व सोडून त्यांच्यासोबत तीन दिवस संसार केला आहे. त्यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. यासाऱ्यात त्यांनी नैतिकता घालविली आहे. त्यामुळे ते अजितदादा यांच्यावर टीका करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.सर्व कटकारस्थानाचे पुरावे मिळाले आहेत. अद्याप तरी हा प्रश्न पक्षाअंतर्गत आहे. याबाबत वरिष्ठांना भेटलो आहे. आता पुरावे ही देणार आहे. कारवाई झाली नाही तर पुढची दिशा ठरवू असं मत एकनाथ खडसेंनी मांडले आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAbdul Sattarअब्दुल सत्तारraosaheb danveरावसाहेब दानवे