शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 09:23 IST

farooq abdullah got a fake call : विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

ठळक मुद्देउधमपूरमध्ये फारूक अब्दुल्ला हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी मोठा खुलासा केला आहे. बनावट कॉलद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. मला एक फोन आला ज्याद्वारे सांगण्यात आले की, तुम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. उधमपूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. (farooq abdullah got a fake call where he was offered rs 50 lakh to support mamta banerjee)

फारूक अब्दुल्ला म्हणाले, "या महिन्यात मला झारखंडहून फोन आला होता, ज्यामध्ये मला सांगण्यात आले की झारखंडचे मुख्यमंत्री तुमच्याशी बोलणार आहेत, सध्या ते दुसर्‍या कॉलवर व्यस्त आहेत. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर मला दुसऱ्यांदा कॉल आला. त्यावेळी सांगण्यात आले की, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, ते ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालला जात आहेत. तुम्हीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील."

'देवेगौडा यांनाही फसवण्याचा प्रयत्न'फारूक अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पार्टीच्या एका खासदारांसोबत यासंदर्भात चर्चा केली. तर त्या खासदारांनी सांगितले की, असे काहीच नाही. इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही असाच फोन आला असल्याचे या खासदाराने सांगितले, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील लोक प्रार्थना करत आहे की, भारत- पाकिस्तान दरम्यान नुकताच झालेला करार कायम रहावा, कारण यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळेल, असे उधमपुरमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "सीमेवरचा तणाव केवळ स्थानिक लोकांच्या जीवनात दुःख आणि वेदना आणतो, शेती व आर्थिक कामे थांबतात आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील जीवनशैली त्याचा परिणाम होतो." 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१