शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 09:23 IST

farooq abdullah got a fake call : विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

ठळक मुद्देउधमपूरमध्ये फारूक अब्दुल्ला हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी मोठा खुलासा केला आहे. बनावट कॉलद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. मला एक फोन आला ज्याद्वारे सांगण्यात आले की, तुम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. उधमपूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. (farooq abdullah got a fake call where he was offered rs 50 lakh to support mamta banerjee)

फारूक अब्दुल्ला म्हणाले, "या महिन्यात मला झारखंडहून फोन आला होता, ज्यामध्ये मला सांगण्यात आले की झारखंडचे मुख्यमंत्री तुमच्याशी बोलणार आहेत, सध्या ते दुसर्‍या कॉलवर व्यस्त आहेत. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर मला दुसऱ्यांदा कॉल आला. त्यावेळी सांगण्यात आले की, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, ते ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालला जात आहेत. तुम्हीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील."

'देवेगौडा यांनाही फसवण्याचा प्रयत्न'फारूक अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पार्टीच्या एका खासदारांसोबत यासंदर्भात चर्चा केली. तर त्या खासदारांनी सांगितले की, असे काहीच नाही. इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही असाच फोन आला असल्याचे या खासदाराने सांगितले, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील लोक प्रार्थना करत आहे की, भारत- पाकिस्तान दरम्यान नुकताच झालेला करार कायम रहावा, कारण यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळेल, असे उधमपुरमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "सीमेवरचा तणाव केवळ स्थानिक लोकांच्या जीवनात दुःख आणि वेदना आणतो, शेती व आर्थिक कामे थांबतात आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील जीवनशैली त्याचा परिणाम होतो." 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१