शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

"ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 09:23 IST

farooq abdullah got a fake call : विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

ठळक मुद्देउधमपूरमध्ये फारूक अब्दुल्ला हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी मोठा खुलासा केला आहे. बनावट कॉलद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. मला एक फोन आला ज्याद्वारे सांगण्यात आले की, तुम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. उधमपूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. (farooq abdullah got a fake call where he was offered rs 50 lakh to support mamta banerjee)

फारूक अब्दुल्ला म्हणाले, "या महिन्यात मला झारखंडहून फोन आला होता, ज्यामध्ये मला सांगण्यात आले की झारखंडचे मुख्यमंत्री तुमच्याशी बोलणार आहेत, सध्या ते दुसर्‍या कॉलवर व्यस्त आहेत. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर मला दुसऱ्यांदा कॉल आला. त्यावेळी सांगण्यात आले की, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, ते ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालला जात आहेत. तुम्हीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील."

'देवेगौडा यांनाही फसवण्याचा प्रयत्न'फारूक अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पार्टीच्या एका खासदारांसोबत यासंदर्भात चर्चा केली. तर त्या खासदारांनी सांगितले की, असे काहीच नाही. इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही असाच फोन आला असल्याचे या खासदाराने सांगितले, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील लोक प्रार्थना करत आहे की, भारत- पाकिस्तान दरम्यान नुकताच झालेला करार कायम रहावा, कारण यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळेल, असे उधमपुरमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "सीमेवरचा तणाव केवळ स्थानिक लोकांच्या जीवनात दुःख आणि वेदना आणतो, शेती व आर्थिक कामे थांबतात आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील जीवनशैली त्याचा परिणाम होतो." 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१