शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन आता संसदेच्या दारात पोहोचणार, २२ जुलैपासून शेतकरी शक्तिप्रदर्शन करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 20:01 IST

Farmers Protest: या महिन्यात होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनातील संयुक्त किसान मोर्चाने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आता पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या आवारात धडकणार आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून देशातील विविध भागातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ( farmers' Protest ) दरम्यान, या महिन्यात होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनातील संयुक्त किसान मोर्चाने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आता पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या आवारात धडकणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात २२ जुलैपासून दररोज सुमारे २०० शेतकरी संसदेसमोर आंदोलन करणार आहेत. (The farmers' Protest will now reach the door of Parliament, the farmers will demonstrate from July 22)

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने विरोधी पक्षांच्या खासदारांनाही इशारा दिला आहे. संसदेमध्ये आमचा आवाज उठवा अन्यथा राजीनामा द्या, असे शेतकऱ्यांनी विरोधकांना सुनावले आहे. त्याआधी ८ जुलै रोजी पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींविरोधात देशभरात आंदोलन होणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली.

तीन कृषी कायद्यांविरोधात ४० हून अधिक शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी सभागृहात कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना एक इशारा पत्र दिले जाईल, असे संयुक्त किसान मोर्चाने सांगितले.

शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले की, आम्ही विरोधी खासदारांनासुद्धा सभागृहामध्ये दरदिवशी या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे आवाहन करणार आहोत. तर या कायद्यांच्या विरोधात आम्ही संसदे बाहेर आंदोलनास बसणार आहोत. संसदेतून सभात्याग करून केंद्र सरकारला लाभ न पोहोचवण्याचे आवाहन आम्ही करू जोपर्यंत सरकार या मुद्द्यावर आमचे समाधान करत नाही तोपर्यंत आम्ही संसदेचे कामकाज चालू देणार नाही.

संसदेचे पावसाळी अधिवेशन हे १९ जुलैपासून सुरू होणार आहे. राजेवाला यांनी सांगितले की, जोपर्यंत आमच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही संसदेबाहेर सातत्याने आंदोलन करू. या आंदोलनासाठी प्रत्येक शेतकरी संघटनेतून ५ जणांना घेतले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.तसेच संयुक्त किसान मोर्चा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतींविरोधीत ८ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. मोर्चाने जनतेला सकाळी १० ते दुपारी १२ या काळात जवळच्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर येऊन तिथे वाहने उभी करण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी