शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 09:01 IST

Farmer Protest: ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. मात्र, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला येऊन पोहोचले आहेत.

गाझियाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांपासून एक कॉल दूर असल्याचे सांगितले. आजही कृषीमंत्र्यांनी दिलेली ऑफर खुली असल्याचे सांगत शेतकरी नेत्यांना आवाहन केले. यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारने कायदे रद्द न करण्यामागची अडचण सांगावी, मी वचन देतो सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही, असा शब्दच देऊन टाकला. 

ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. मात्र, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला येऊन पोहोचले आहेत. यामुळे टिकैत यांना देखील स्फुरन चढले आहे. सरकारची अशी कोणती अडचण आहे की नवीन कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाहीय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

सरकार शेतकऱ्यांना त्यांची बाजू सांगू शकते. आम्ही शेतकरी असे लोक आहोत जे पंचायत राजवर विश्वास ठेवतो. आम्ही कधी जगासमोर सरकारची मान शरमेने खाली जाऊ देणार नाही. सरकारसोबत आमची वैचारिक लढाई आहे. ही लढाई लाठ्या, काठ्या, बंदुकांनी लढली जाऊ शकत नाही. नाही त्याद्वारे दाबली जाऊ शकते. जेव्हा नवीन कायदे मागे घेतले जातील तेव्हाच आम्ही शेतकरी आपल्या घरी परत जाऊ, असेही टिकैत यांनी सांगितले. 

मोदी सरकार अखेर नरमले! कृषी कायद्यांवर विरोधकांना दिले मोठे आश्वासनशेतकरी आंदोलनाच्या छायेत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणावर काँग्रेससह जवळपास 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. कृषी कायद्यांवर मोदी सरकारने चर्चाच केली नाही, विरोध पक्षांना महत्व दिले नाही असा आरोप या नेत्यांनी केला होता. आता यावर मोदी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. यामुळे मोदी सरकारकडून कृषी कायद्यांवर अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता. यामुळे अधिवेशनात कोणताही गोंधळ नको म्हणून मोदी सरकार प्रयत्न करत आहे. 

Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

आंदोलन स्थळ रिकामे करणार होते टिकैत, पण भाजपा आमदाराने सारा खेळ बिघडवला?

 26 जानेवारीला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसेवरून गाझियाबाद सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत हे आंदोलन संपविण्याची तयारी करत होते. मात्र, अचानक आमदार महोदय आंदोलनस्थळी पोहोचले आणि सारा खेळच बिघडवून टाकला. टिकैत यांनी त्या आमदारांवरही सरकारसोबत मिळून कट रचत असल्याचा आरोप केला आहे. भारतीय किसान युनियनने आमदार नंद किशोर गुर्जर आणि साहिदाबादचे आमदार सुनिल वर्मावर शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्याचे आरोप केले आहेत. नंद किशोर गुर्जर हे गाझियाबादच्या लोनीचे आमदार आहेत. सुत्रांनी सांगितले की, राकेश टिकैत यांनी आंदोलन संपवावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा योग्य दिशेने जात होता. टिकैत आंदोलन स्थळ रिकामे करण्यास तयार झाले होते. अचानक सारा खेळ बिघडला. भाजपा आमदार गुर्जर त्यांच्या 100 हून अधिक समर्थकांना घेऊन आंदोलनात घुसले. यामुळे टिकैत यांनी अधिकाऱ्यांसोबतची चर्चा अर्धवट सोडली आणि थेट मंचावर जाऊन उभे राहिले. टिकैत यांनी असेच आरोप सुनिल शर्मा यांच्यावर लावले आहेत. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी