शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 04:06 IST

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले.

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून दिल्लीत वादंग सुरू झाला असताना प्रदेश काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना मुंबईत महाराष्ट्रात फिरणे मुश्कील करू, असा, इशारा पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या ‘त्या’ पत्रावर स्वाक्षऱ्या असल्यामुळे राहुल गांधी यांच्याशी निष्ठा दाखवण्याची चालून आलेली संधी अनेकांनी सोडली नाही. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी गांधी घराण्यावर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे अत्यंत निंदाजनक आहे. तीनही नेत्यांनी ताबडतोब माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात करणे मुश्किल करू, असा इशारा दिला. तर भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे. इतिहासात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच खा. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा पूर्ण विश्वास आहे असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले....तर सरकारमधून बाहेर पडू - वडेट्टीवारकाँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. म्हणूनच जे पत्र सोनिया गांधींना लिहिलं आहे, त्याकडे सध्याच्या नेतृत्वाला विरोध म्हणून पाहिले जाऊ नये. राहुल गांधींनी आम्हाला सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितले, तर आम्ही तत्काळ बाहेर पडू. एक दिवसही सरकारमध्ये राहणार नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण