शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 04:06 IST

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले.

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून दिल्लीत वादंग सुरू झाला असताना प्रदेश काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना मुंबईत महाराष्ट्रात फिरणे मुश्कील करू, असा, इशारा पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या ‘त्या’ पत्रावर स्वाक्षऱ्या असल्यामुळे राहुल गांधी यांच्याशी निष्ठा दाखवण्याची चालून आलेली संधी अनेकांनी सोडली नाही. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी गांधी घराण्यावर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे अत्यंत निंदाजनक आहे. तीनही नेत्यांनी ताबडतोब माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात करणे मुश्किल करू, असा इशारा दिला. तर भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे. इतिहासात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच खा. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा पूर्ण विश्वास आहे असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले....तर सरकारमधून बाहेर पडू - वडेट्टीवारकाँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. म्हणूनच जे पत्र सोनिया गांधींना लिहिलं आहे, त्याकडे सध्याच्या नेतृत्वाला विरोध म्हणून पाहिले जाऊ नये. राहुल गांधींनी आम्हाला सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितले, तर आम्ही तत्काळ बाहेर पडू. एक दिवसही सरकारमध्ये राहणार नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण