शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

UP Election 2022: “BJP वाले मतं मागायला आले तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 14:27 IST

UP Election 2022: वाराणसी दौऱ्यावर असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी धक्कादायक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देभाजपवाल्यांची चांगलीच धुलाई कराBJP वाले मतं मागायला आले तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नकाओमप्रकाश राजभर यांच्या धक्कादायक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

वाराणसी: येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सर्वांत आघाडीवर भाजप असल्याचे दिसत असून, भाजपला पराभूत करण्यासाठी काही पक्षांनी एकत्र आले आहेत. यामध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या नेते ओमप्रकाश राजभर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. वाराणसी दौऱ्यावर असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी धक्कादायक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मते मागायला आले, तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका, असे विधान केले आहे. (up election 2022 om prakash rajbhar advises women to beat up bjp leaders in varanasi)

ओमप्रकाश राजभर वाराणसी येथील भोजूबीर भागात एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी महिलांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेतेमंडळी जर मते मागायला आली, तरी त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका. ते येतील दोन पायांवर, पण जातील चौघांच्या खांद्यावर, असे राजभर यांनी म्हटले आहे. 

“ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र

भाजपवाल्यांची चांगलीच धुलाई करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने आग्रहाने जनधन खाती उघडायला लावली. यामागील मुख्य उद्देश त्या खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करण्याचा होता. मात्र, तसे काहीच झाले नाही. त्यामुळे आता यापुढे भाजपवाले मते मागायला आले, तर त्यांची चांगलीच धुलाई करा. भाजपवाले येतील दोन पायांवर पण चौघांच्या खांद्यावरून परत जातील, असे वादग्रस्त विधान राजभर यांनी केले. तसेच महिलांचे आरक्षण लवकरात लवकर लागू करावे. पुन्हा आलात, तर जीवंत परत जाऊ शकणार नाही. मोफत रेशन देऊन भाजप गरिबांना गुलाम बनवू पाहत आहे. देशातील सर्व भाजप नेत्यांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन करायची वेळ आलीय, असे राजभर यांनी म्हटले आहे. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

दरम्यान, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथ