शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

UP Election 2022: “BJP वाले मतं मागायला आले तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 14:27 IST

UP Election 2022: वाराणसी दौऱ्यावर असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी धक्कादायक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देभाजपवाल्यांची चांगलीच धुलाई कराBJP वाले मतं मागायला आले तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नकाओमप्रकाश राजभर यांच्या धक्कादायक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

वाराणसी: येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सर्वांत आघाडीवर भाजप असल्याचे दिसत असून, भाजपला पराभूत करण्यासाठी काही पक्षांनी एकत्र आले आहेत. यामध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या नेते ओमप्रकाश राजभर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. वाराणसी दौऱ्यावर असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी धक्कादायक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मते मागायला आले, तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका, असे विधान केले आहे. (up election 2022 om prakash rajbhar advises women to beat up bjp leaders in varanasi)

ओमप्रकाश राजभर वाराणसी येथील भोजूबीर भागात एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी महिलांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेतेमंडळी जर मते मागायला आली, तरी त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका. ते येतील दोन पायांवर, पण जातील चौघांच्या खांद्यावर, असे राजभर यांनी म्हटले आहे. 

“ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र

भाजपवाल्यांची चांगलीच धुलाई करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने आग्रहाने जनधन खाती उघडायला लावली. यामागील मुख्य उद्देश त्या खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करण्याचा होता. मात्र, तसे काहीच झाले नाही. त्यामुळे आता यापुढे भाजपवाले मते मागायला आले, तर त्यांची चांगलीच धुलाई करा. भाजपवाले येतील दोन पायांवर पण चौघांच्या खांद्यावरून परत जातील, असे वादग्रस्त विधान राजभर यांनी केले. तसेच महिलांचे आरक्षण लवकरात लवकर लागू करावे. पुन्हा आलात, तर जीवंत परत जाऊ शकणार नाही. मोफत रेशन देऊन भाजप गरिबांना गुलाम बनवू पाहत आहे. देशातील सर्व भाजप नेत्यांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन करायची वेळ आलीय, असे राजभर यांनी म्हटले आहे. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

दरम्यान, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथ