शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान भाजपामध्ये बंडाळी, आमदार म्हणाले हे मंत्रिमंडळ सवर्णविरोधी

By बाळकृष्ण परब | Updated: February 9, 2021 13:06 IST

Bihar Cabinet Expansion News : काठावरचे बहुमत मिळवून बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे.

पाटणा - काठावरचे बहुमत मिळवून बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराला वादविवादांचे ग्रहण लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपात धुसफूस सुरू झाली असून, भाजपाच्या एका आमदाराने आपल्याच पक्षाच्या मंत्रिमंडळावर जोरदार टीका केली आहे.भाजपाचे आमदार ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनी मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान आपल्याच पक्षाच्या मंत्रिमंडळावर टीका केली आहे. बाढ मतदारसंघातील भाजपा आमदार ज्ञानेंद्र सिंह यांनी आपला पक्ष आणि नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काही नेत्यांना भाजपाला आपल्या खिशातील पक्ष बनवले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ना क्षेत्रिय समीकरणे विचारात घेतली आहेत ना सामाजिक समीकरणे लक्षात घेतली आहेत. आज झालेला मंत्रिमंडळ विस्तार हा सवर्णविरोधी आहे, या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांनी आपल्या मर्जीतल्या लोकांची वर्णी लावली आहे. तर अन्य नेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लॉबिंग होत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्रिपद अशा व्यक्तीला दिली गेले आहे ज्याला काहीच माहिती नाही. राजपूत समाजातून येणाऱ्या ज्ञानू यांनी आरोप केला की, काही लोकांनी भाजपाला केवळ यादव आणि बनिया लोकांचा पक्ष बनवले आहे. पक्षातील अनेक आमदार या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज आहे. आता आम्ही यावर चर्चा करून पुढे निर्णय घेऊ.बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारचा शपथविधी झाल्यावर मंगळवारी ८४ दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाMLAआमदारPoliticsराजकारण