शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लाट नसल्याने शिवसेनेसमोर मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 00:51 IST

२०१४ सारखी लाट नसल्याने यंदा शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे.

- नजीर शेखऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, शिवसेनेचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी लढत होत आहे. २०१४ सारखी लाट नसल्याने यंदा शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे.चारवेळा विजयी झालेले खासदार खैरे हे शिवसेनेचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, यंदा त्यांच्याविरुद्ध वातावरण असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांना काँग्रेसचे आ. झांबड यांनी आव्हान दिले आहे. मात्र, एमआयएमचे आ. जलील यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेससमोर अडचणी आहेत. दुसऱ्या बाजूला आ. जाधव यांनी खैरेंविरुद्ध आघाडी उघडत दंड थोपटल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. मतदारसंघात एक गोष्ट दिसत आहे. आ. झांबड म्हणतात, माझी लढत खा. खैरे यांच्याशी आहे. आ. जलील म्हणतात, आम्ही शिवसेनेविरुद्ध लढा देत आहोत, तर आ. जाधव म्हणतात माझा मुकाबला केवळ खैरे यांच्याशी आहे. मात्र, शिवसेनेकडून आमची लढत एमआयएमशी असल्याचे मुद्दामहून सांगितले जात आहे.खैरे यांना आ. जाधव यांचा धोका आहे, तर आ. झांबड यांना आ. जलील यांची भीती आहे. आ. जाधव यांची भिस्त ही मुख्यत: ग्रामीण मराठा मतदारांवर आहे. आ. जलील यांना वंचित आघाडीमुळे दलित समाजाची ६० ते ७० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजात त्यांच्याविषयीची नाराजी प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुस्लिम समाजाची एमआयएमला भरभरून मतेमिळणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे.शहरातील कचरा, पाणी समस्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धची नाराजी याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार आ. झांबड यांना होऊ शकतो. राष्टÑवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारात उतरल्याने काँग्रेसचे झांबड यांची बाजू भक्कम झाली आहे. मतांची विभागणी आणि जातीय ध्रुविकरण कसे होते, यावर या तिरंगी लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.>शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचा हा किल्ला अभेद्य आहे. आतापर्यंत अनेकांनी हा किल्ला भेदण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. आगामी काळात शेतकºयांच्या प्रश्नावर तसेच पाणी आणि रस्ते यावर आपला भर असेल.- चंद्रकांत खैरे,उमेदवार शिवसेना>गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यात विकासकामे झालीच नाहीत. कचरा आणि पाणीटंचाईने औरंगाबादकर वैतागले आहेत. शेतकºयांची कर्जमाफी झालीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही युतीच्या विरोधात वातावरण आहे. आता बदल होणारच.- आ. सुभाष झांबड,उमेदवार, काँग्रेस>कळीचे मुद्देऔरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांमध्ये सरकारविषयी नाराजी.मुद्यांवर फारसा प्रचार नाही. एकमेकांविरुद्ध असणाºया घटकांना आपल्याकडे वळविण्याच्या गणितावर भर.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद