शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं

By प्रविण मरगळे | Updated: September 24, 2020 16:22 IST

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेला करावे लागले त्यावरूनही गेल्या 24 तासांत पावसाने मुंबईत केलेल्या धुमशानाची कल्पना येते.

ठळक मुद्दे 1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता.सर्व यंत्रणांनीदेखील आपापली जबाबदारी सांभाळायला हवी.महापालिकेतील कर्मचाऱ्यांविरोधात एकतर्फी बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखेच

मुंबईमुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणे आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणे हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक आपले बोंबा मारणे सुरूच ठेवतात अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून विरोधकांना फटकारलं आहे.

हवामान खात्याने मान्सूनच्या परतीचा ‘मुहूर्त’ काही दिवसांपूर्वी सांगितला आहे. तरी सध्या सुरू असलेले पावसाचे धुमशान पाहता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकणसह खान्देश, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आदी भागांत आणखी काही दिवस त्याचा मुक्काम राहील अशी चिन्हे आहेत. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जच आहेत, पण आपल्याकडे अनेकदा ‘मान्सूनची लहर; केला कहर’ अशीच स्थिती असते. हवामान खात्याने पावसाचा अलर्ट पुन्हा दिला आहे. तेव्हा प्रशासकीय यंत्रणांना हायअलर्ट राहावेच लागेल असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

सामना अग्रलेखाती महत्त्वाचे मुद्दे

मुंबई आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी हे काही नवीन समीकरण नाही. मंगळवारी तेच घडले. फक्त 24 तासांत तब्बल 286.4 मिमी पाऊस मुंबापुरीवर कोसळला. मागील अडीच दशकातील 24 तासांत कोसळलेला हा विक्रमी पाऊस होता.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेला करावे लागले त्यावरूनही गेल्या 24 तासांत पावसाने मुंबईत केलेल्या धुमशानाची कल्पना येते. 1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता.

बरं, सव्वा कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या या महानगरीचे चलनवलन फक्त एकटय़ा महापालिकेच्या हातात आहे का, तर तसेही नाही. इतरही सरकारी यंत्रणांकडे मुंबईच्या वेगवेगळय़ा कामांची जबाबदारी आहे. अशा सर्व यंत्रणांनीदेखील आपापली जबाबदारी सांभाळायला हवी.

प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसाने मुंबईचे काही भाग जलमय होतात, त्याचा परिणाम जनजीवनावर, वाहतुकीवर होतो. पुन्हा मुंबईची भौगोलिक आणि इतर स्थिती याचाही भाग आहेच. अशाही परिस्थितीत महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात.

अशा वेळी त्यांच्याविरुद्ध एकतर्फी बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखेच आहे. मुंबईतील पाणी तुंबले म्हणून बोंब मारणारे नागपूर, अहमदाबाद अशाच प्रकारे जलमय होते तेव्हा मात्र गप्प असतात. मुंबई पावसाने जलमय होऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे. तशी ती घेतली जातच असते, पण 24 तासांत अडीच दशकातील विक्रमी पाऊस कोसळत असेल तर कसे व्हायचे?

बरे, मागील काही वर्षांत मुंबईच्या पावसानेही ‘मूड’ बदलला आहे. कधी तो 24 तासांत विक्रमी प्रमाणात पडतो तर कधी महिन्याच्या पावसाची सरासरी दोन-तीन दिवसांत पूर्ण करून मोकळा होतो. याही वर्षी जुलै, ऑगस्ट आणि आता तेच घडले. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षी पावसाचे भरभरून दान पडले आहे.

एरवी दुष्काळाची परिसीमा गाठणाऱया मराठवाडा, विदर्भात पर्जन्यकृपा झाली आहे. जायकवाडी, कोयनासारखी धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील इतरही मोठे, मध्यम सिंचन प्रकल्प भरले आहेत. काही मोजके तालुके वगळता या वर्षी वरुणराजाने राज्यावर तशी कृपाच केली आहे.

रब्बी पिकासाठी ते चांगले असले तरी मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेला पाऊस, न मिळालेली उघडीप यामुळे खरिपाच्या काही पिकांना तडाखा बसू शकतो. तूर, कापूस, सोयाबीन, भात आदी पिकांना आता उघडीप हवी आहे. ती मिळाली नाही तर ही पिके हातची जाऊ शकतात.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईRainपाऊस