शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं

By प्रविण मरगळे | Updated: September 24, 2020 16:22 IST

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेला करावे लागले त्यावरूनही गेल्या 24 तासांत पावसाने मुंबईत केलेल्या धुमशानाची कल्पना येते.

ठळक मुद्दे 1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता.सर्व यंत्रणांनीदेखील आपापली जबाबदारी सांभाळायला हवी.महापालिकेतील कर्मचाऱ्यांविरोधात एकतर्फी बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखेच

मुंबईमुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणे आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणे हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक आपले बोंबा मारणे सुरूच ठेवतात अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून विरोधकांना फटकारलं आहे.

हवामान खात्याने मान्सूनच्या परतीचा ‘मुहूर्त’ काही दिवसांपूर्वी सांगितला आहे. तरी सध्या सुरू असलेले पावसाचे धुमशान पाहता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकणसह खान्देश, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आदी भागांत आणखी काही दिवस त्याचा मुक्काम राहील अशी चिन्हे आहेत. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जच आहेत, पण आपल्याकडे अनेकदा ‘मान्सूनची लहर; केला कहर’ अशीच स्थिती असते. हवामान खात्याने पावसाचा अलर्ट पुन्हा दिला आहे. तेव्हा प्रशासकीय यंत्रणांना हायअलर्ट राहावेच लागेल असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

सामना अग्रलेखाती महत्त्वाचे मुद्दे

मुंबई आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी हे काही नवीन समीकरण नाही. मंगळवारी तेच घडले. फक्त 24 तासांत तब्बल 286.4 मिमी पाऊस मुंबापुरीवर कोसळला. मागील अडीच दशकातील 24 तासांत कोसळलेला हा विक्रमी पाऊस होता.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेला करावे लागले त्यावरूनही गेल्या 24 तासांत पावसाने मुंबईत केलेल्या धुमशानाची कल्पना येते. 1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता.

बरं, सव्वा कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या या महानगरीचे चलनवलन फक्त एकटय़ा महापालिकेच्या हातात आहे का, तर तसेही नाही. इतरही सरकारी यंत्रणांकडे मुंबईच्या वेगवेगळय़ा कामांची जबाबदारी आहे. अशा सर्व यंत्रणांनीदेखील आपापली जबाबदारी सांभाळायला हवी.

प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसाने मुंबईचे काही भाग जलमय होतात, त्याचा परिणाम जनजीवनावर, वाहतुकीवर होतो. पुन्हा मुंबईची भौगोलिक आणि इतर स्थिती याचाही भाग आहेच. अशाही परिस्थितीत महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात.

अशा वेळी त्यांच्याविरुद्ध एकतर्फी बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखेच आहे. मुंबईतील पाणी तुंबले म्हणून बोंब मारणारे नागपूर, अहमदाबाद अशाच प्रकारे जलमय होते तेव्हा मात्र गप्प असतात. मुंबई पावसाने जलमय होऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे. तशी ती घेतली जातच असते, पण 24 तासांत अडीच दशकातील विक्रमी पाऊस कोसळत असेल तर कसे व्हायचे?

बरे, मागील काही वर्षांत मुंबईच्या पावसानेही ‘मूड’ बदलला आहे. कधी तो 24 तासांत विक्रमी प्रमाणात पडतो तर कधी महिन्याच्या पावसाची सरासरी दोन-तीन दिवसांत पूर्ण करून मोकळा होतो. याही वर्षी जुलै, ऑगस्ट आणि आता तेच घडले. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षी पावसाचे भरभरून दान पडले आहे.

एरवी दुष्काळाची परिसीमा गाठणाऱया मराठवाडा, विदर्भात पर्जन्यकृपा झाली आहे. जायकवाडी, कोयनासारखी धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील इतरही मोठे, मध्यम सिंचन प्रकल्प भरले आहेत. काही मोजके तालुके वगळता या वर्षी वरुणराजाने राज्यावर तशी कृपाच केली आहे.

रब्बी पिकासाठी ते चांगले असले तरी मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेला पाऊस, न मिळालेली उघडीप यामुळे खरिपाच्या काही पिकांना तडाखा बसू शकतो. तूर, कापूस, सोयाबीन, भात आदी पिकांना आता उघडीप हवी आहे. ती मिळाली नाही तर ही पिके हातची जाऊ शकतात.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईRainपाऊस