शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

“कुणालाही सांगू नका, कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची भूमिका”

By प्रविण मरगळे | Updated: December 17, 2020 10:08 IST

आम्ही आजपर्यंत जे आरोप केले त्याला विजयवर्गीय यांनी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देप्रदेशातील लोकप्रिय आणि जनादेशाचं कमलनाथ सरकार नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर पाडण्यात आलं कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानामुळे हे स्पष्ट झालं आहे की काँग्रेसने केलेले आरोप सत्य आहेत.काँग्रेस सरकार असंवैधानिकपणे पाडण्यात देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात

इंदूर – मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार पाडण्यासाठी कोणाची महत्त्वाची भूमिका राहिली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे असं मोठं विधान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. इंदूर येथे शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करत होते. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि कृषी कायद्यावर सुरु असलेल्या गदारोळामध्ये भाजपाने देशातील विविध शहरात शेतकरी संमेलनाचं आयोजन केले आहे. इंदूर येथे शेतकरी संमेलनाची जबाबदारी कैलास विजयवर्गीय आणि नरोत्तम मिश्रा यांना देण्यात आली. यावेळी भाषणादरम्यान कैलास विजयवर्गीय म्हणाले की, जोपर्यंत कमलनाथ सरकार मध्य प्रदेशात होती, एकदिवसही सुखाने झोपू दिले नाही. कमलनाथ यांना स्वप्नातही भाजपाचा कार्यकर्ता दिसत असेल ते नरोत्तम मिश्रा आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच पडद्यामागील गोष्ट सांगतो, कुणालाही सांगू नका, मीदेखील आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावरून सांगत आहे, कमलनाथ यांचे सरकार पाडण्यामध्ये जर कोणाची महत्त्वाची भूमिका असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. धर्मेंद प्रधान यांची नव्हती, ही गोष्ट कोणालाही सांगू नका, मीदेखील कोणाला बोललो नाही असं कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.

कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं सांगितले की, आम्ही आजपर्यंत जे आरोप केले त्याला विजयवर्गीय यांनी दुजोरा दिला आहे. काँग्रेसच्या सर्व आरोपांची खातरजमा स्वत: भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी शेतकरी संमेलनात दिली आहे. प्रदेशातील लोकप्रिय आणि जनादेशाचं कमलनाथ सरकार नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर पाडण्यात आलं असं काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचं सरकार पाडण्यामध्ये आमचं काहीही योगदान नाही असं भाजपा सुरुवातीपासून खोटं बोलत आहे, काँग्रेसच्या अंतर्गत वादातून कमलनाथ सरकार पडलं पण आज कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानामुळे हे स्पष्ट झालं आहे की काँग्रेसने केलेले आरोप सत्य आहेत. भाजपा लोकांची फसवणूक करत आहे, काँग्रेस सरकार असंवैधानिकपणे पाडण्यात देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे असंही काँग्रेसने सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा