शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

“कुणालाही सांगू नका, कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची भूमिका”

By प्रविण मरगळे | Updated: December 17, 2020 10:08 IST

आम्ही आजपर्यंत जे आरोप केले त्याला विजयवर्गीय यांनी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देप्रदेशातील लोकप्रिय आणि जनादेशाचं कमलनाथ सरकार नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर पाडण्यात आलं कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानामुळे हे स्पष्ट झालं आहे की काँग्रेसने केलेले आरोप सत्य आहेत.काँग्रेस सरकार असंवैधानिकपणे पाडण्यात देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात

इंदूर – मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार पाडण्यासाठी कोणाची महत्त्वाची भूमिका राहिली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे असं मोठं विधान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. इंदूर येथे शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करत होते. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि कृषी कायद्यावर सुरु असलेल्या गदारोळामध्ये भाजपाने देशातील विविध शहरात शेतकरी संमेलनाचं आयोजन केले आहे. इंदूर येथे शेतकरी संमेलनाची जबाबदारी कैलास विजयवर्गीय आणि नरोत्तम मिश्रा यांना देण्यात आली. यावेळी भाषणादरम्यान कैलास विजयवर्गीय म्हणाले की, जोपर्यंत कमलनाथ सरकार मध्य प्रदेशात होती, एकदिवसही सुखाने झोपू दिले नाही. कमलनाथ यांना स्वप्नातही भाजपाचा कार्यकर्ता दिसत असेल ते नरोत्तम मिश्रा आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच पडद्यामागील गोष्ट सांगतो, कुणालाही सांगू नका, मीदेखील आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावरून सांगत आहे, कमलनाथ यांचे सरकार पाडण्यामध्ये जर कोणाची महत्त्वाची भूमिका असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. धर्मेंद प्रधान यांची नव्हती, ही गोष्ट कोणालाही सांगू नका, मीदेखील कोणाला बोललो नाही असं कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.

कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं सांगितले की, आम्ही आजपर्यंत जे आरोप केले त्याला विजयवर्गीय यांनी दुजोरा दिला आहे. काँग्रेसच्या सर्व आरोपांची खातरजमा स्वत: भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी शेतकरी संमेलनात दिली आहे. प्रदेशातील लोकप्रिय आणि जनादेशाचं कमलनाथ सरकार नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर पाडण्यात आलं असं काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचं सरकार पाडण्यामध्ये आमचं काहीही योगदान नाही असं भाजपा सुरुवातीपासून खोटं बोलत आहे, काँग्रेसच्या अंतर्गत वादातून कमलनाथ सरकार पडलं पण आज कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानामुळे हे स्पष्ट झालं आहे की काँग्रेसने केलेले आरोप सत्य आहेत. भाजपा लोकांची फसवणूक करत आहे, काँग्रेस सरकार असंवैधानिकपणे पाडण्यात देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे असंही काँग्रेसने सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा