शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का...?; देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 13:14 IST

Maharashtra Budget Session 2021: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली होती ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची मागणी

ठळक मुद्देनाना पटोले यांनी केली होती ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची मागणीवन राज्यमंत्र्यांनी केली समिती स्थापण्याची घोषणा

तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना सुरू केली होती. त्यांनी राज्यात रावबलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, यासाठी विधीमंडळाची समिती स्थापन करण्यात येणार येणार असल्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात कोणताही घोळ नसल्याचं म्हटलं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीये का असा सवालही केला. "सध्या ७५ टक्के वृक्ष जीवंत आहे. खरं तर ६० टक्क्यांचा दर अपेक्षित असतो. हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे. त्यावरच आता हे लोकं समितीही स्थापन करणार. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मंत्र्यांचा विश्वास नाहीये का?, किंवा मुख्यमंत्र्यांना याची माहितीच नाहीये का?," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांना चुकीचं ब्रिफिंग होतंय का? मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं आहे. राजकीय आखाड्यासारखा या सभागृहाचा वापर केला. आम्हाला अडचण नाही. पण राजकीय आखाड्यासारखा उपयोग करणं योग्य नाही. फक्त तुमच्या मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे की नाही हे सांगावं, असंही त्यांनी नमूद केलं. नाना पटोलेंची मागणीवृक्ष लागवडीबाबत विधीमंडळाच्या समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तसंच ही समिती सहा महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण करणार असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यासाठी तब्बल २ हजार ४२९ कोटी रूपयांचा निधीही खर्च झाला होता.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारAjit Pawarअजित पवारMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट