शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

पंतप्रधानांना देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेश निवडणूक जिंकायचीय का?, ‘फाळणी स्मृती दिना’वरून नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:32 IST

nana patole : स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

नागपूर : देशाच्या फाळणीचाही स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. हे मोठे षडयंत्र आहे. फाळणीची मोठी किंमत या देशाने भोगली आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त काँग्रेसतर्फे ‘जरा याद करो कुर्बानी’ कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामतील सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, १४ ऑगस्ट १९४७ राेजी देशाची फाळणी झाली. त्या दिवशी मोठा रक्तपात झाला. हिंदू-मुस्लिम दंगल झाली. तो स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. अशा दिवसाचाही स्मृतिदिन कुणी पाळेल का? हे मोठे षडयंत्र आहे. आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हे होत नाही ना, अशी शंका येते.भाजपने केवळ ओबीसींचेच आरक्षण संपवले असे नाही तर अनुसूचित जाती-जमातीचेही आरक्षण संपवण्याची तयारी केली असल्याचा इशारा पटोले यांनी कार्यक्रमात बोलताना दिला.

महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणीनितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले ते दिल्लीतील नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. २५ वर्षे हे दोघेही सोबत होते. तेव्हा काही अडचण नव्हती. महामार्गाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर काँग्रेस गडकरी यांच्या पाठीशी आहे. महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

कोरोनाच्या रूपात केंद्राने मोठे कांड घडविलेकोरोनाच्या रूपात केंद्राने देशात जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही मोठे कांड घडवून आणले. चीनमधून हा रोग भारतात कसा आला याचे उत्तर अजूनही पंतप्रधान देत नाहीत. कोरोनामध्ये लाखो लोक तडफडून मेले, याला केंद्र जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदी