शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांना देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेश निवडणूक जिंकायचीय का?, ‘फाळणी स्मृती दिना’वरून नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:32 IST

nana patole : स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

नागपूर : देशाच्या फाळणीचाही स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. हे मोठे षडयंत्र आहे. फाळणीची मोठी किंमत या देशाने भोगली आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त काँग्रेसतर्फे ‘जरा याद करो कुर्बानी’ कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामतील सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, १४ ऑगस्ट १९४७ राेजी देशाची फाळणी झाली. त्या दिवशी मोठा रक्तपात झाला. हिंदू-मुस्लिम दंगल झाली. तो स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. अशा दिवसाचाही स्मृतिदिन कुणी पाळेल का? हे मोठे षडयंत्र आहे. आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हे होत नाही ना, अशी शंका येते.भाजपने केवळ ओबीसींचेच आरक्षण संपवले असे नाही तर अनुसूचित जाती-जमातीचेही आरक्षण संपवण्याची तयारी केली असल्याचा इशारा पटोले यांनी कार्यक्रमात बोलताना दिला.

महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणीनितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले ते दिल्लीतील नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. २५ वर्षे हे दोघेही सोबत होते. तेव्हा काही अडचण नव्हती. महामार्गाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर काँग्रेस गडकरी यांच्या पाठीशी आहे. महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

कोरोनाच्या रूपात केंद्राने मोठे कांड घडविलेकोरोनाच्या रूपात केंद्राने देशात जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही मोठे कांड घडवून आणले. चीनमधून हा रोग भारतात कसा आला याचे उत्तर अजूनही पंतप्रधान देत नाहीत. कोरोनामध्ये लाखो लोक तडफडून मेले, याला केंद्र जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदी