शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांचा मतदान यंत्रांवर अविश्वास; पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 07:01 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ मतदारसंघांत मतदान पार पडल्यानंतर काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी रविवारी मतदान यंत्रांवर पुन्हा एकदा अविश्वास व्यक्त केला

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ मतदारसंघांत मतदान पार पडल्यानंतर काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी रविवारी मतदान यंत्रांवर पुन्हा एकदा अविश्वास व्यक्त केला आणि निवडणूक नि:ष्पक्ष व विश्वासार्ह व्हावी, यासाठी किमान ५० टक्के मतदान यंत्रांमधील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी व्हायलाच हवी, ही मागणी घेऊन पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालायात जाण्याचे ठरविले.याबाबतीत विरोधी पक्षांच्या वतीने हिरिरीने पुढाकार घेणारे तेलगु देसम पक्षाचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एम. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन पहिल्या टप्प्यातील मतदानात मतदान यंत्रे मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्याची तक्रार केली होती. तोच विषय पुढे नेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेऊन आपली रणनीती ठरविली व नंतर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आडमुठेपणावरही टीका केली.नायडू म्हणाले की, आयोग प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सरधोपटपणे निवडलेल्या एका मतदानयंत्रातील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी करण्याचे ठरविले होते. त्याऐवजी किमान ५० टक्के यंत्रांची पडताळणी व्हावी यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. न्यायालयाने पाच यंत्रांच्या पडताळणीचा आदेश दिला. पण खास करून पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर न्यायालयाच्या आदेशाने आमचे समाधान झालेले नाही. त्यामुळे आधीच्या आदेशाचा फेरविचार करण्यासाठी पुन्हा न्यायालयात जाऊ.काँग्रेसतर्फे डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, पुन्हा न्यायालयात जाण्यासोबतच आम्ही यावर देशव्यापी आंदोलन करू. पहिल्या फेरीच्या मतादानाच्या वेळी मतदानयंत्रांबद्दल ज्या मोठया प्रमाणावर तक्रारी आल्या त्या पाहता ५० टक्के ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणीची अधिक गरज निर्माण झाली आहे. निवडणूक आयोग याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचेही ते म्हणाले.दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, मतदानयंत्रांवरचा लोकांचा विश्वास उघड चालला आहे व त्यांना पुन्हा पूर्वीसारखे मतपत्रिकेने मतदान हवे आहे. पण आता ऐनवेळी हा बदल करण्यास वेळ अपुरा असल्याने ५० टक्के ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी हाच उत्तम पर्याय आहे. मतदानयंत्रांमध्ये यांत्रिक बिघाड होत नाही तर भाजपला विजयी करण्यासाठी प्रोग्रामिंग करून यंत्रांमध्ये हेराफेरी केली जात आहे, असा त्यांनी आरोप केला.>‘ही तर पराभवाची कबुली’विरोधी पक्षांची ही पत्रकार परिषद म्हणजे ‘महागठबंधन’ची निवडणुकीआधीच पराभवाची कबुली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली. प्रवक्ते जीएलव्ही नरसिंह राव म्हणाले की, विरोधी पक्षांकडे सुशासनाचा कोणताही अजेंडा नाही. लोकांना स्फूर्ती देणारे नेतृत्व नाही. नकारात्मकता हेच या पक्षांना एकत्र आणणारे समान सूत्र आहे. विकासाच्या वाटेवर निघालेल्या देशाला मागे खेचणे एवढेच त्यांचे काम आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय