शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

प. बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार? ममता की भाजपा; जाणून घ्या जनमताचा कौल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:06 IST

जनमत चाचणीचा अंदाज, पुडुचेरीमध्ये सत्तांतराचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज एबीपी-सी व्हाेटर यांच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये हाेणाऱ्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार असून, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये सत्तांतराचा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. 

भारतीय जनता पार्टीसाठी पश्चिम बंगाल येथील निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे. तेथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काॅंग्रेससाेबत थेट टक्कर आहे. मात्र, जनमत चाचणीनुसार सत्ता ममतांच्याच पारड्यात जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांपैकी तृणमूल काॅंग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. ममतांना भाजपकडून यंदा कडवे आव्हान मिळणार असून, भाजपच्या वाट्याला ९२ ते १०८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काॅंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला ३१ ते ३९ जागा मिळू शकतात. तृणमूल काॅंग्रेसला ४३ टक्के, भाजपला ३८ टक्के, तर काॅंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला १३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत ममतांना २११ जागा मिळाल्या हाेत्या. मात्र, यंदा सत्ता कायम राखण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला, तरीही माेठ्या प्रमाणात जागा घटण्याची शक्यता आहे. हीच स्थिती काॅंग्रेस आणि डाव्या आघाडीबाबत आहे. गेल्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपने प. बंगालकडे मार्चा वळविला हाेता. भाजपने २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला आहे. 

आसाममध्ये भाजपच जनमत चाचणीनुसार आसाममध्ये भाजपचीच सत्ता येईल, असा अंदाज आहे. आसाममधील १२६ जागांपैकी एनडीएला ६८ ते ७६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काॅंग्रेसच्या महाआघाडीला ४३ ते ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये सत्ताधाऱ्यांनाच काैलकेरळमध्ये सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळणार आहे, असा जनमत चाचणीचा अंदाज आहे. केरळमध्ये सत्ताधारी डाव्या आघाडीला १४० पैकी ८३ ते ९१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काॅंग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीला ४७ ते ५५ जागा मिळतील, असा अंदाज आहे. भाजपला मात्र केवळ ० ते २ जागा मिळतील, अशी शक्यता आहे. पुडुचेरीमध्येही सत्ता परिवर्तन हाेण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी एकूण ३० जागांपैकी ‘एनडीए’ला १७ ते २१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काॅंग्रेस आघाडीला ८ ते १२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. 

तामिळनाडूत सत्ता परिवर्तनतामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन हाेण्याचा अंदाज आहे. एकूण २३४ जागांपैकी सत्ताधारी ‘एआयएडीएमके’ आघाडीला ५८ ते ६६ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर ‘डीएमके’ १५४ ते १६२ जागा मिळवून सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर हाेत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यासाठी ‘डीएमके’चे नेते एम. के. स्टॅलीन यांनी काॅंग्रेससाेबत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला माेठे यश मिळेल, असा अंदाज आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा