शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विरोधकांच्या एकजुटीची सत्त्वपरीक्षा, आज राज्यसभा उपसभापतीपदाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 11:50 IST

सत्ताधारी भाजपतर्फे जदयूचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह तर विरोधकांकडून काँग्रेसचे बीके हरिप्रसाद मैदानात

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी आज मतदान होणार असून विरोधकांनी संख्याबळ नसतानाही उमेदवार दिला आहे. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची एकजुट पहायला मिळणार आहे. सत्ताधारी भाजपतर्फे जदयूचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह तर विरोधकांकडून काँग्रेसचे बीके हरिप्रसाद मैदानात उतरले आहेत. आज दुपारी 12 वाजता मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे.   गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावेळी दोनही बाजुंकडील काही घटक पक्षांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्यसभेतही हे पक्ष अनुपस्थित राहतील की मते फुटतील याची उत्सुकता दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधांनीही आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, संख्याबळ पाहता हरिवंश सिंह याची निवड पक्की मानली जात आहे.   बुधवारी विरोधकांपैकी एक पक्ष असलेल्या बीजेडीने भाजपप्रणित उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांना मोठा झटका बसला आहे. त्यातच आपच्या खासदारांनीही राहुल गांधी स्वत: केजरीवाल यांच्याशी बोलल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला मत देऊ, अशी  अट ठेवली आहे. तसेच भाजपवर नाराज असलेल्या शिवसेनेनेही हरिवंश यांना पाठिंबा दिला आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनाच अनुमोदकाच्या भुमिकेत आहे. 

कोण राहणार अनुपस्थित? हरिवंश सिंह यांना मतदान करण्यासाठी जेडीयूच्या नितिश कुमार यांनी आपच्या केजरीवाल यांना फोन केला होता. मात्र, त्यांचा उमेदवार भाजपच्या पाठिंब्यावर उभा असल्याने केजरीवाल यांनी नकार दिला आहे. तसेच आपने काँग्रेसला घातलेली अट मान्य न झाल्यास आपसमोर अनुपिस्थत राहण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. याचबरोबर वायएसआर काँग्रेसचे 2, पीडीपी 2, डीएमकेचे 1 सदस्य अनुपस्थित राहू शकतात. यामुळे विजयासाठी लागणारे संख्याबळ कमी होईल. 

कोणाकडे किती संख्याबळ?   एनडीएचे 91 सदस्य, तीन स्वीकृत सदस्य, अमर सिंह, अन्नाद्रमुकचे 13, टीआरएसचे 6, आयएनएलडीचा एक असे मिळून 115 मते हरिवंश सिंह यांना पडण्याची शक्यता आहे. तर बीजेडीकडे 9 मते आहेत. नवीन पटनायक यांनीही समथर्न दिले आहे. वायएसआर काँग्रेसने समथर्न दिल्यास भाजपच्या उमेदवाराला 126 मते मिळू शकतात.   तर युपीएकडे काँग्रेसची 61 मते, तृणमूल आणि सपचे प्रत्येकी 13, टीडीपी 6, सीपीएम 5, बसप आणि डीएमकेचे प्रत्येकी 4, सीपीआयचे 2 आणि जेडीएसचे 1 असे संख्याबळ आहे. यामध्ये अपक्ष आणि स्वीकृत सदस्य मिळून हे संख्याबळ 111 होणार आहे.राज्यसभेमध्ये 244 सदस्य असतात. यामुळे विजयासाठी 123 मते आवश्यक आहेत.   

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक