शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

विरोधकांच्या एकजुटीची सत्त्वपरीक्षा, आज राज्यसभा उपसभापतीपदाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 11:50 IST

सत्ताधारी भाजपतर्फे जदयूचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह तर विरोधकांकडून काँग्रेसचे बीके हरिप्रसाद मैदानात

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी आज मतदान होणार असून विरोधकांनी संख्याबळ नसतानाही उमेदवार दिला आहे. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची एकजुट पहायला मिळणार आहे. सत्ताधारी भाजपतर्फे जदयूचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह तर विरोधकांकडून काँग्रेसचे बीके हरिप्रसाद मैदानात उतरले आहेत. आज दुपारी 12 वाजता मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे.   गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावेळी दोनही बाजुंकडील काही घटक पक्षांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्यसभेतही हे पक्ष अनुपस्थित राहतील की मते फुटतील याची उत्सुकता दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधांनीही आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, संख्याबळ पाहता हरिवंश सिंह याची निवड पक्की मानली जात आहे.   बुधवारी विरोधकांपैकी एक पक्ष असलेल्या बीजेडीने भाजपप्रणित उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांना मोठा झटका बसला आहे. त्यातच आपच्या खासदारांनीही राहुल गांधी स्वत: केजरीवाल यांच्याशी बोलल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला मत देऊ, अशी  अट ठेवली आहे. तसेच भाजपवर नाराज असलेल्या शिवसेनेनेही हरिवंश यांना पाठिंबा दिला आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनाच अनुमोदकाच्या भुमिकेत आहे. 

कोण राहणार अनुपस्थित? हरिवंश सिंह यांना मतदान करण्यासाठी जेडीयूच्या नितिश कुमार यांनी आपच्या केजरीवाल यांना फोन केला होता. मात्र, त्यांचा उमेदवार भाजपच्या पाठिंब्यावर उभा असल्याने केजरीवाल यांनी नकार दिला आहे. तसेच आपने काँग्रेसला घातलेली अट मान्य न झाल्यास आपसमोर अनुपिस्थत राहण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. याचबरोबर वायएसआर काँग्रेसचे 2, पीडीपी 2, डीएमकेचे 1 सदस्य अनुपस्थित राहू शकतात. यामुळे विजयासाठी लागणारे संख्याबळ कमी होईल. 

कोणाकडे किती संख्याबळ?   एनडीएचे 91 सदस्य, तीन स्वीकृत सदस्य, अमर सिंह, अन्नाद्रमुकचे 13, टीआरएसचे 6, आयएनएलडीचा एक असे मिळून 115 मते हरिवंश सिंह यांना पडण्याची शक्यता आहे. तर बीजेडीकडे 9 मते आहेत. नवीन पटनायक यांनीही समथर्न दिले आहे. वायएसआर काँग्रेसने समथर्न दिल्यास भाजपच्या उमेदवाराला 126 मते मिळू शकतात.   तर युपीएकडे काँग्रेसची 61 मते, तृणमूल आणि सपचे प्रत्येकी 13, टीडीपी 6, सीपीएम 5, बसप आणि डीएमकेचे प्रत्येकी 4, सीपीआयचे 2 आणि जेडीएसचे 1 असे संख्याबळ आहे. यामध्ये अपक्ष आणि स्वीकृत सदस्य मिळून हे संख्याबळ 111 होणार आहे.राज्यसभेमध्ये 244 सदस्य असतात. यामुळे विजयासाठी 123 मते आवश्यक आहेत.   

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक