शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

'300 युनिट मोफत वीज, जुनी बिलेही माफ होतील', केजरीवालांचे उत्तराखंडमधील जनतेला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 14:44 IST

Arvind Kejriwal : उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व जुनी बिले माफ केली जातील आणि लोकांना 24 तास मोफत वीज देण्यात येईल. याशिवाय, शेतकऱ्यांनाही मोफत वीजदेखील देण्यात येईल, असे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (AAP ) आज आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा केली. उत्तराखंडमध्ये आपचे सरकार स्थापन झाल्यानंतर 300 युनिट वीज सर्वसामान्यांना मोफत देण्यात येईल, असे आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी जाहीर केले. तसेच, उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व जुनी बिले माफ केली जातील आणि लोकांना 24 तास मोफत वीज देण्यात येईल. याशिवाय, शेतकऱ्यांनाही मोफत वीजदेखील देण्यात येईल, असे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. (delhi cm arvind kejriwal announced to give 300 units of electricity free after formation of government in uttarakhand)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका ट्विटमध्ये उत्तराखंडमधील लोकांना मोफत वीज देण्याचे संकेत दिले होते. 'दिल्ली स्वतः वीजनिर्मिती करत नाही, इतर राज्यातून खरेदी करते, तरीही दिल्लीत वीज मोफत आहे. उत्तराखंडमधील लोकांना मोफत वीज का मिळू नये?,' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. 

देहरादून दौर्‍यापूर्वी पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण, राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडीं दरम्यान आम आदमी पार्टी ज्या पद्धतीने सक्रिय झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

डेहराडूनमध्ये जनतेला आश्वासनआज डेहराडूनमध्ये अरविंद केजरीवाल दाखल झाले. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला वीजसंबंधित 4 आश्वासने दिले. 'सत्ताधारी पक्षाकडे मुख्यमंत्रीच नाही. त्यांचा पार्टी स्वतःच असे म्हणतात की, आमचा मुख्यमंत्री वाईट आहे, भाजपामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी लढा सुरू आहे. विरोधी पक्षाकडे नेता नाही, ते दिल्लीला फेऱ्या मारण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीतउत्तराखंडच्या विकासाबद्दल कोण विचार करेल?' असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, उत्तराखंडमधील बरेच लोक दिल्लीत राहतात आणि ते दिल्लीत विकास कसा होत आहे, हे सांगतात. आज मी विशेषतः विजेच्या क्षेत्रासंबंधी 4 आश्वासने देतो, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

पार्टीची 4 आश्वासने1- दिल्लीमध्ये करुन दाखविल्यानुसार, उत्तराखंडमध्ये आमचे सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक कुटुंबाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल.2- जुनी बिले माफ केली जातील.3- कोणतीही वीज कपात होणार नाही, 24 तास वीज दिली जाईल.4- शेतकर्‍यांना शेतीसाठी मोफत वीज दिली जाईल.

लवकरच मुख्यमंत्र्यांची घोषणाजर सरकार स्थापन झाले तर उत्तराखंडमध्ये 5 वर्ष कोणत्याही गोष्टीवर कोणताही अतिरिक्त कर वाढविला जाणार नाही आणि जास्तीचे कर्ज घेतले जाणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांचा चेहरा उत्तराखंडचा असेल. मी लवकरच येईन आणि मुख्यमंत्र्यांचा नावाची घोषणा करेन.'

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप