शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची निर्णायक खेळी, योगी-मोदींचे टेंन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:15 IST

Congress in Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसनेही ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस पुढीलवर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही आघाडीशिवाय निवडणूक लढवून स्वबळावर पुढचे सरकार स्थापन करण्याची काँग्रेसमध्ये क्षमता प्रियंका गांधींच्या नेतृत्वामध्ये राज्यात विविध स्तरांवर काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत झाली आहे

लखनौ - लोकसंख्या आणि विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीला आता काही महिने राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसनेही ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक अजय कुमार लल्लू यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोठी घोषणा केली आहे. (The decisive game of the Congress for the Uttar Pradesh Assembly elections, will increase the tension between Yogi and Modi)

काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही पक्षांसोबत आघाडी करणार नसल्याचे सांगत कुठल्याही आघाडीशिवाय निवडणूक लढवून स्वबळावर पुढचे सरकार स्थापन करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास अजय कुमार लल्लू यानी व्यक्त केला. तसेच काँग्रेस पुढीलवर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा करत लल्लू यांनी काँग्रेस राज्याच्या सत्तेत तीन दशकांनंतर पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये लल्लू म्हणाले की, काँग्रेस दमनकारी उत्तर प्रदेश सरकारला आव्हान देणार प्रमुख पक्ष म्हणून समोर आला आहे. ४०३ सदस्य असलेल्या विधानसभेमध्ये केवळ पाच सदस्य असलेला काँग्रेस पक्ष ४९ आमदार असलेल्या समाजवादी पक्षापेक्षा अधिक प्रभावी विरोधी पक्ष ठरला आहे. तसेच राज्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत असे सांगत अजय कुमार लल्लू म्हणाले की, ‘’बदलाव की आंधी है जिसका नाम प्रियंका गांधी है’’ अशी घोषणाच लल्लू यांनी दिली.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, प्रियंका गांधींच्या नेतृत्वामध्ये राज्यात विविध स्तरांवर काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत झाली आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार का बनवू नये, असे विचारले असता लल्लू यांनी सांगितले की, मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला चेहरा बनवले पाहिजे याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व घेईल. प्रियंका गांधी ह्या राज्याच्या प्रभारी आहेत आणि त्यांच्या देखरेखीखालीच विधानसभा निवडणूक लढवली जाईल. 

त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशचे लोक काँग्रेसकडे अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचेच सरकार बनेल. दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव असलेल्या प्रियंका गांधी ह्या या महिन्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. जिथे त्यांचे लक्ष्य हे कॅडरला उत्साहित करणे आणि पक्षाला सत्ताधारी भाजपासोबत सुरू असलेल्या निवडणुकीच्या लढाईसाठी तयार करण्याचे असेल.

या निवडणुकीत काँग्रेस सपा आणि बसपासोबत आघाडी करणार का? असे विचारले असता लल्लू म्हणाले की, काँग्रेस जनता, शेतकरी, गरीब, महिला आणि दलितांसोबतच्या मुद्यांशी आघाडी करणार आहे. काँग्रेस या आघाडीसह लोकांसमोर जाईल आणि आम्हाला जनतेची साथ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधी