शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची निर्णायक खेळी, योगी-मोदींचे टेंन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:15 IST

Congress in Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसनेही ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस पुढीलवर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही आघाडीशिवाय निवडणूक लढवून स्वबळावर पुढचे सरकार स्थापन करण्याची काँग्रेसमध्ये क्षमता प्रियंका गांधींच्या नेतृत्वामध्ये राज्यात विविध स्तरांवर काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत झाली आहे

लखनौ - लोकसंख्या आणि विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीला आता काही महिने राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसनेही ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक अजय कुमार लल्लू यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोठी घोषणा केली आहे. (The decisive game of the Congress for the Uttar Pradesh Assembly elections, will increase the tension between Yogi and Modi)

काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही पक्षांसोबत आघाडी करणार नसल्याचे सांगत कुठल्याही आघाडीशिवाय निवडणूक लढवून स्वबळावर पुढचे सरकार स्थापन करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास अजय कुमार लल्लू यानी व्यक्त केला. तसेच काँग्रेस पुढीलवर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा करत लल्लू यांनी काँग्रेस राज्याच्या सत्तेत तीन दशकांनंतर पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये लल्लू म्हणाले की, काँग्रेस दमनकारी उत्तर प्रदेश सरकारला आव्हान देणार प्रमुख पक्ष म्हणून समोर आला आहे. ४०३ सदस्य असलेल्या विधानसभेमध्ये केवळ पाच सदस्य असलेला काँग्रेस पक्ष ४९ आमदार असलेल्या समाजवादी पक्षापेक्षा अधिक प्रभावी विरोधी पक्ष ठरला आहे. तसेच राज्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत असे सांगत अजय कुमार लल्लू म्हणाले की, ‘’बदलाव की आंधी है जिसका नाम प्रियंका गांधी है’’ अशी घोषणाच लल्लू यांनी दिली.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, प्रियंका गांधींच्या नेतृत्वामध्ये राज्यात विविध स्तरांवर काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत झाली आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार का बनवू नये, असे विचारले असता लल्लू यांनी सांगितले की, मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला चेहरा बनवले पाहिजे याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व घेईल. प्रियंका गांधी ह्या राज्याच्या प्रभारी आहेत आणि त्यांच्या देखरेखीखालीच विधानसभा निवडणूक लढवली जाईल. 

त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशचे लोक काँग्रेसकडे अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचेच सरकार बनेल. दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव असलेल्या प्रियंका गांधी ह्या या महिन्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. जिथे त्यांचे लक्ष्य हे कॅडरला उत्साहित करणे आणि पक्षाला सत्ताधारी भाजपासोबत सुरू असलेल्या निवडणुकीच्या लढाईसाठी तयार करण्याचे असेल.

या निवडणुकीत काँग्रेस सपा आणि बसपासोबत आघाडी करणार का? असे विचारले असता लल्लू म्हणाले की, काँग्रेस जनता, शेतकरी, गरीब, महिला आणि दलितांसोबतच्या मुद्यांशी आघाडी करणार आहे. काँग्रेस या आघाडीसह लोकांसमोर जाईल आणि आम्हाला जनतेची साथ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधी