शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

देश व लोकशाही वाचविण्यासाठी विरोधकांचा एकजुटीचा निर्धार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:40 AM

दंगली व विद्वेष पसरविणाऱ्या, देशातील घटनात्मक संस्था मोडून टाकणा-या मोदी सरकार व भाजपाला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे.

कोलकाता : दंगली व विद्वेष पसरविणाऱ्या, देशातील घटनात्मक संस्था मोडून टाकणा-या मोदी सरकार व भाजपाला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे. तसे न केल्यास भाजपा लोकशाहीदेखील पायदळी तुडवेल. त्यामुळे देश व लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून, जनतेनेही दुसºया स्वातंत्र्यासाठी तयार राहावे. औषधांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुदत आता संपली आहे. येत्या लोकसभा निवडणुकांनंतर देशाला नवा पंतप्रधान मिळेल, हे नक्की. तो कोण असेल, याचा विचार नंतर करता येईल, असे सांगत, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर सारे विरोधक प्रथमच एकत्र आले होते. त्यामुळे ही जाहीर सभा २२ विरोधी पक्षांच्या ऐक्याचे दर्शनच होते. परेड ग्राउंडवर ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या सभेला सुमारे ८ लाख लोक हजर होते. भाजपाचे खा. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह वाजपेयी सरकारधील अरुण शौरी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांनीही मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी नव्हे, तर जनतेचे प्रश्नच अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सिन्हा यांनी केले, तर जीएसटी घाईघाईत लागू केल्याने अर्थव्यवस्था कोलमडल्याची टीका अरुण शौरी यांनी केली. खरे बोलणे ही बंडखोरी असेल, तर होय, मी बंडखोर आहे, असे शत्रुघ्न सिन्हा ठामपणे म्हणाले.मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपामुळे लोकशाही धोक्यात आल्याची टीका केली, तर दंगली पसरविण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. शरद पवार यांनी आपल्याला आता राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, असे सांगतानाच, लोकशाही व घटनात्मक संस्था बळकट ठेवण्यासाठी राजकीय परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. देवळांद्वारे भाजपा धार्मिक विद्वेष व तणाव पसरवत असल्याची टीका चंद्राबाबू नायडू यांनी केली. हार्दिक पटेल यांनी ‘सुभाषचंद्र बोस गोºयांशी लढले, तर आता आपल्याला चोरांशी लढायचे आहे, असे उद्गार काढले.देश अखंड ठेवण्यासाठी मोदी सरकार हटविणे गरजेचे आहे, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले. देशाला मोदी हुकूमशाहीकडे नेत असून, जनतेने दुसºया स्वातंत्र्यासाठी तयार राहावे, असे स्टॅलिन म्हणाले. गेगांग अपांग व झोराम नॅशनल फ्रंटचे लालडुहावमा यांनी नागरिकत्व विधेयकामुळे ईशान्येकडील राज्ये वेगळी पडत असल्याचा इशारा दिला. रोजगार देण्यातील अपयश, नोटाबंदी व जीएसटीमुळे गेलेल्या नोकºया, अल्पसंख्यांक व दलितांवरील अत्याचार, राफेल घोटाळा, विरोधी सरकारे पाडण्याचा प्रयत्न यांवरूनही या नेत्यांनी टीकेची झोड उठविली.>व्यासपीठावर नेत्यांची मांदियाळीचकाँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे व अभिषेक मनु सिंघवी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय लोक दलाचे अजित सिंग, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन, अलीकडेच भाजपातून बाहेर पडलेले अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग, पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणी, बसपाचे नेते सतीशचंद्र मिश्रा, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, आसामच्या युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे बद्रुद्दिन अजमल, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविताना, पंतप्रधानपदाबाबत मतभेद नसल्याचा दावा केला.