शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

कारशेड वळविण्याच्या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प ठरेल अव्यवहार्य; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 03:11 IST

Devendra Fadanvis, Uddhav Thackeray News: महाविकास आघाडीने मुंबईकरांचा विश्वासघात केला

मुंबई : आरेमेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचे आर्थिक गणित कोलमडणार असून प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता संपेल. शिवाय, प्रकल्पाचा खर्च वाढून अखेर त्याची वसुली मुंबईकरांकडून वाढीव तिकीटदराच्या माध्यमातून केली जाईल. महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या समितीने आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक असल्याचा निष्कर्ष काढला होता, असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली.

कारशेड कांजूरला हलविण्याच्या निर्णयामुळे चार-पाच वर्षे कारडेपोच नसेल. त्यामुळे प्रकल्पाचे काम असून नसल्यासारखे असेल, असे फडणवीस यांनी आज टिष्ट्वटरवरून म्हटले. कारशेडची जागा बदलून सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला. प्रकल्पाला आणखी विलंब करण्यामुळे कार्बनचे उत्सर्जन वाढून पर्यावरणाची अधिक हानी होईल. त्यामुळे वृक्षतोडीच्या परिणामांपेक्षा आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक आहे, असा निष्कर्ष खुद्द महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या समितीनेच काढला. २०१५ साली कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता. या जागेवरून न्यायालयात दावे सुरू असल्याने विचार सोडावा लागला, असे सांगत यासंदर्भातील कागदपत्रेच फडणवीस यांनी उघड केली.पर्यावरणवादी समर्थन करणार का?कांजूरमार्गच्या जागेवरही पर्यावरणाची हानी, जैवविविधेला धोका आणि जनतेची प्रचंड गैरसोय असे अनेक प्रश्न निर्माण होतील. आरे कारशेडची जागा कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित केली होती. आता पर्यावरणवादी मंडळी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का, असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Metroमेट्रोAarey ColoneyआरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे