शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
4
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
5
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
6
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
7
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
8
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
9
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
10
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
11
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
13
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
14
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
15
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
16
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
17
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
18
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
19
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

कारशेड वळविण्याच्या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प ठरेल अव्यवहार्य; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 03:11 IST

Devendra Fadanvis, Uddhav Thackeray News: महाविकास आघाडीने मुंबईकरांचा विश्वासघात केला

मुंबई : आरेमेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचे आर्थिक गणित कोलमडणार असून प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता संपेल. शिवाय, प्रकल्पाचा खर्च वाढून अखेर त्याची वसुली मुंबईकरांकडून वाढीव तिकीटदराच्या माध्यमातून केली जाईल. महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या समितीने आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक असल्याचा निष्कर्ष काढला होता, असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली.

कारशेड कांजूरला हलविण्याच्या निर्णयामुळे चार-पाच वर्षे कारडेपोच नसेल. त्यामुळे प्रकल्पाचे काम असून नसल्यासारखे असेल, असे फडणवीस यांनी आज टिष्ट्वटरवरून म्हटले. कारशेडची जागा बदलून सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला. प्रकल्पाला आणखी विलंब करण्यामुळे कार्बनचे उत्सर्जन वाढून पर्यावरणाची अधिक हानी होईल. त्यामुळे वृक्षतोडीच्या परिणामांपेक्षा आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक आहे, असा निष्कर्ष खुद्द महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या समितीनेच काढला. २०१५ साली कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता. या जागेवरून न्यायालयात दावे सुरू असल्याने विचार सोडावा लागला, असे सांगत यासंदर्भातील कागदपत्रेच फडणवीस यांनी उघड केली.पर्यावरणवादी समर्थन करणार का?कांजूरमार्गच्या जागेवरही पर्यावरणाची हानी, जैवविविधेला धोका आणि जनतेची प्रचंड गैरसोय असे अनेक प्रश्न निर्माण होतील. आरे कारशेडची जागा कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित केली होती. आता पर्यावरणवादी मंडळी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का, असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Metroमेट्रोAarey ColoneyआरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे