शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये NDA सरकारवर संकट?; जेलमधून लालू प्रसाद यादवांचा आमदारांना फोन, मोदींचा गंभीर आरोप

By प्रविण मरगळे | Updated: November 24, 2020 22:51 IST

Bihar BJP Sushil Modi, Lalu Prasad yadav News: तुम्ही करताय ते बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने करत आहात, यात अयशस्वी व्हाल असं मोदींनी लालू प्रसाद यादव यांना सांगितलं.

ठळक मुद्देरांचीमधून लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करत आहेत, या आमदारांना महाआघाडीत येण्यासाठी गळ घालत आहेतइतकचं नाही तर लालूंनी अनेक नेत्यांना मंत्रिपद देण्याचं आमिषदेखील दाखवलं हळूहळू निकाल बदलले आणि महाआघाडीला मागे टाकत एनडीएने बिहारमध्ये बहुमत मिळवलं

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आले, त्याठिकाणी जेडीयू आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं, परंतु अवघ्या काही दिवसांतच एनडीएच्या सरकारवर संकट येण्याची चिन्हे दिसत आहेत. बिहारमध्ये भाजपाला ७४ जागा मिळाल्या तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या आहेत, एनडीएला बिहारमध्ये काठावरचं बहुमत असल्याने आगामी काळात सरकार कोसळण्याचं संकट कायम आहे.

यातच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा आरोप लावला आहे. लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करून त्यांना महाआघाडीत सहभागी होण्यासाठी लालच देत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. याबाबत सुशील मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की, रांचीमधून लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करत आहेत, या आमदारांना महाआघाडीत येण्यासाठी गळ घालत आहेत. इतकचं नाही तर लालूंनी अनेक नेत्यांना मंत्रिपद देण्याचं आमिषदेखील दाखवलं असल्याचं त्यांनी सांगितले.

सुशील कुमार मोदींनी या ट्विटमध्ये एक नंबरही जारी केला आहे. माहिती मिळाल्यानंतर मी लालू प्रसाद यादव यांना 8051216302 या नंबरवर कॉल केला, त्यांनी फोन उचलला. तुम्ही करताय ते बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने करत आहात, यात अयशस्वी व्हाल असं मोदींनी लालू प्रसाद यादव यांना सांगितलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सुरुवातीला महाआघाडीचं सरकार बनेल अशी खात्री वाटत होती, मात्र हळूहळू निकाल बदलले आणि महाआघाडीला मागे टाकत एनडीएने बिहारमध्ये बहुमत मिळवलं, एनडीएला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या, यावेळी महाआघाडीने राज्यात सरकार बनवणार असल्याचं अनेकदा सांगितले.

आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं

बिहार निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले होते, तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली होती. "जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे असंही तेजस्वी यादव यांनी सांगितले होते.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक