शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

coronavirus: "महाराष्ट्राची मदत रोखणारे झारीतले राजकीय शुक्राचार्य कोण?’’, संजय राऊत यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 11:10 IST

coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत.

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरील उपचारांसाठी पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut Criticize BJP & Central Government)

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी आमची मागणी आहे. पंतप्रधानांचं परवाचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की, ऑक्सिजन, रेमडेसिवीर कमी पडणार नाही. मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जातायत. हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही टंचाई महाराष्ट्रात का निर्माण होतेय, हा प्रश्न पडतोय. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? जे महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवाशी खेळताहेत. संकटाच्या प्रसंगी कुणी वैर घेऊन राजकारण करू नये. राज्याचे आरोग्यमंत्री केंद्राशी संवाद साधून प्रश्न सोडवतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशासंदर्भात भूमिका असू शकते. पण शेवटी त्यांनी राज्याराज्यातील परिस्थितीनुसार निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा असे सांगितले. त्यानुसार राज्यात निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश आलेले आहे. सरकारमधील काही मंत्र्यांनी कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन लावा, अशी मागणी केली आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनेचे सूत्र आहे, असे विधानही संजय राऊत यांनी यावेळी केले.     देशातील तीन लाखांची जी संख्या आहे ती चाचणी केलेल्यांची आहे. मात्र देशात काही अशी राज्ये आहेत जिथे चाचण्या होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णसंख्या अधिक आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला. दरम्यान,  

गुजरातमधील भाजपाच्या कार्यालयात रेमडेसिविर मोफत मिळत आहे. वृत्तपत्रात जाहीराती येताहेत. रेमडेसिविर एकाच राजकीय पक्षाला मिळताहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याकडे रेमडेसिविर येत नाही, ही बाब गंभीर आहे. हायकोर्टाने हस्तक्षेप केलाय. पण त्याने काय होणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मात्र महाराष्ट्रात नागूपर हायकोर्टाने राज्य सरकारला रेमडेसिविरवरून फटकारले असता संजय राऊत यांनी 

दरम्यान, केंद्र सरकारकडून इकडून तिकडून पैसा गोळा करून तो बंगालमध्ये खर्च केला जातोय.  केंद्र सरकारने राज्य सरकारचे देणे असलेला पैसा लवकर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अमित शाहा यांनी महाराष्ट्रातील सरकार आपल्या ओझ्याने पडेल अशा केलेल्या विधानाचाही समाचार घेताना सरकारचे ओझे वाढल्यावर अमित शाहा यांना कळवू, असा टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार