शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

coronavirus: "महाराष्ट्राची मदत रोखणारे झारीतले राजकीय शुक्राचार्य कोण?’’, संजय राऊत यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 11:10 IST

coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत.

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरील उपचारांसाठी पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut Criticize BJP & Central Government)

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी आमची मागणी आहे. पंतप्रधानांचं परवाचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की, ऑक्सिजन, रेमडेसिवीर कमी पडणार नाही. मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जातायत. हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही टंचाई महाराष्ट्रात का निर्माण होतेय, हा प्रश्न पडतोय. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? जे महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवाशी खेळताहेत. संकटाच्या प्रसंगी कुणी वैर घेऊन राजकारण करू नये. राज्याचे आरोग्यमंत्री केंद्राशी संवाद साधून प्रश्न सोडवतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशासंदर्भात भूमिका असू शकते. पण शेवटी त्यांनी राज्याराज्यातील परिस्थितीनुसार निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा असे सांगितले. त्यानुसार राज्यात निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश आलेले आहे. सरकारमधील काही मंत्र्यांनी कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन लावा, अशी मागणी केली आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनेचे सूत्र आहे, असे विधानही संजय राऊत यांनी यावेळी केले.     देशातील तीन लाखांची जी संख्या आहे ती चाचणी केलेल्यांची आहे. मात्र देशात काही अशी राज्ये आहेत जिथे चाचण्या होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णसंख्या अधिक आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला. दरम्यान,  

गुजरातमधील भाजपाच्या कार्यालयात रेमडेसिविर मोफत मिळत आहे. वृत्तपत्रात जाहीराती येताहेत. रेमडेसिविर एकाच राजकीय पक्षाला मिळताहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याकडे रेमडेसिविर येत नाही, ही बाब गंभीर आहे. हायकोर्टाने हस्तक्षेप केलाय. पण त्याने काय होणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मात्र महाराष्ट्रात नागूपर हायकोर्टाने राज्य सरकारला रेमडेसिविरवरून फटकारले असता संजय राऊत यांनी 

दरम्यान, केंद्र सरकारकडून इकडून तिकडून पैसा गोळा करून तो बंगालमध्ये खर्च केला जातोय.  केंद्र सरकारने राज्य सरकारचे देणे असलेला पैसा लवकर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अमित शाहा यांनी महाराष्ट्रातील सरकार आपल्या ओझ्याने पडेल अशा केलेल्या विधानाचाही समाचार घेताना सरकारचे ओझे वाढल्यावर अमित शाहा यांना कळवू, असा टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार