शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

CoronaVirus News: ...म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, फिल्डवर दिसत नाहीत; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 09:13 IST

CoronaVirus News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. वर्षा निवासस्थानात बसून राज्यातील परिस्थिती कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे. गेल्या काही दिवसांत राज्यांत काही अप्रिय घटना घडल्या. रुग्णालयांत झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला नाही. दुर्घटनेत नातेवाईक गमावलेल्या व्यक्तींचं सांत्वन केलं नाही. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. या टीकेला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.कठोर निर्बंध १५ मेपर्यंत, मंत्रिमंडळाचा निर्णय; पोलीसही घेणार कडक भूमिकाकुठेही दुर्घटना घडली की तिथे लगेच पोलीस, अग्निशमन दल पोहोचतं. तिथली स्थानिक यंत्रणा तिथे पोहोचते. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू होतं. अशा ठिकाणी व्हीआयपी गेल्यावर तिथल्या मदतकार्यावर परिणाम होतो. मदतकार्यास विलंब होतो, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. राज्यात गेल्या काही दिवसांत काही अप्रिय घटना घडल्या. तिथे आरोग्यमंत्री, पालकमंत्री पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी तातडीनं मदत पोहोचवणं गरजेचं होतं. ती मदत तिथे पोहोचवली गेली, अशी माहिती आदित्य यांनी दिली.महाराष्ट्राची यंदा 'एकसष्ठी', महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारीप्रत्येक वेळी टीव्हीवर येऊन सांत्वन होत नाही. प्रत्येक प्रसंगात टीव्हीवर येणं गरजेचंदेखील नसतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला. 'दुर्घटनास्थळी आम्ही गेल्यावर तिथे गर्दी होते. पोलीस बंदोबस्तस वाढवला जातो. याचा परिणाम तिथे सुरू असलेल्या मदतकार्यावर होतो. आम्ही तिथे गेल्यावर माध्यमांशी बोलतो. त्यावेळी तिथे मदतकार्यात अडथळे येतात. ज्या ठिकाणी मदतकार्य वेगानं व्हायला हवं, त्याच गोष्टीला व्हीआयपींच्या भेटीमुळे उशीर होतो,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.एखाद्या परिसरात दुर्घटना घडल्यास तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतात. मदतकार्य वेगानं होईल यासाठी प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांत रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडल्या. त्यावेळी तिथले पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री जिल्ह्यातील प्रशासनाशी संपर्क साधून मदतीचा आढावा घेतात. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात. जनरलनं वॉर रुममध्ये राहून काम करायचं असतं. इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही सध्या याच पद्धतीनं काम करत आहेत, असं आदित्य यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे