शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

CoronaVirus News: ...म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, फिल्डवर दिसत नाहीत; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 09:13 IST

CoronaVirus News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. वर्षा निवासस्थानात बसून राज्यातील परिस्थिती कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे. गेल्या काही दिवसांत राज्यांत काही अप्रिय घटना घडल्या. रुग्णालयांत झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला नाही. दुर्घटनेत नातेवाईक गमावलेल्या व्यक्तींचं सांत्वन केलं नाही. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. या टीकेला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.कठोर निर्बंध १५ मेपर्यंत, मंत्रिमंडळाचा निर्णय; पोलीसही घेणार कडक भूमिकाकुठेही दुर्घटना घडली की तिथे लगेच पोलीस, अग्निशमन दल पोहोचतं. तिथली स्थानिक यंत्रणा तिथे पोहोचते. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू होतं. अशा ठिकाणी व्हीआयपी गेल्यावर तिथल्या मदतकार्यावर परिणाम होतो. मदतकार्यास विलंब होतो, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. राज्यात गेल्या काही दिवसांत काही अप्रिय घटना घडल्या. तिथे आरोग्यमंत्री, पालकमंत्री पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी तातडीनं मदत पोहोचवणं गरजेचं होतं. ती मदत तिथे पोहोचवली गेली, अशी माहिती आदित्य यांनी दिली.महाराष्ट्राची यंदा 'एकसष्ठी', महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारीप्रत्येक वेळी टीव्हीवर येऊन सांत्वन होत नाही. प्रत्येक प्रसंगात टीव्हीवर येणं गरजेचंदेखील नसतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला. 'दुर्घटनास्थळी आम्ही गेल्यावर तिथे गर्दी होते. पोलीस बंदोबस्तस वाढवला जातो. याचा परिणाम तिथे सुरू असलेल्या मदतकार्यावर होतो. आम्ही तिथे गेल्यावर माध्यमांशी बोलतो. त्यावेळी तिथे मदतकार्यात अडथळे येतात. ज्या ठिकाणी मदतकार्य वेगानं व्हायला हवं, त्याच गोष्टीला व्हीआयपींच्या भेटीमुळे उशीर होतो,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.एखाद्या परिसरात दुर्घटना घडल्यास तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतात. मदतकार्य वेगानं होईल यासाठी प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांत रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडल्या. त्यावेळी तिथले पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री जिल्ह्यातील प्रशासनाशी संपर्क साधून मदतीचा आढावा घेतात. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात. जनरलनं वॉर रुममध्ये राहून काम करायचं असतं. इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही सध्या याच पद्धतीनं काम करत आहेत, असं आदित्य यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे