शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

CoronaVirus News: ...म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, फिल्डवर दिसत नाहीत; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 09:13 IST

CoronaVirus News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. वर्षा निवासस्थानात बसून राज्यातील परिस्थिती कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे. गेल्या काही दिवसांत राज्यांत काही अप्रिय घटना घडल्या. रुग्णालयांत झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला नाही. दुर्घटनेत नातेवाईक गमावलेल्या व्यक्तींचं सांत्वन केलं नाही. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. या टीकेला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.कठोर निर्बंध १५ मेपर्यंत, मंत्रिमंडळाचा निर्णय; पोलीसही घेणार कडक भूमिकाकुठेही दुर्घटना घडली की तिथे लगेच पोलीस, अग्निशमन दल पोहोचतं. तिथली स्थानिक यंत्रणा तिथे पोहोचते. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू होतं. अशा ठिकाणी व्हीआयपी गेल्यावर तिथल्या मदतकार्यावर परिणाम होतो. मदतकार्यास विलंब होतो, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. राज्यात गेल्या काही दिवसांत काही अप्रिय घटना घडल्या. तिथे आरोग्यमंत्री, पालकमंत्री पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी तातडीनं मदत पोहोचवणं गरजेचं होतं. ती मदत तिथे पोहोचवली गेली, अशी माहिती आदित्य यांनी दिली.महाराष्ट्राची यंदा 'एकसष्ठी', महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारीप्रत्येक वेळी टीव्हीवर येऊन सांत्वन होत नाही. प्रत्येक प्रसंगात टीव्हीवर येणं गरजेचंदेखील नसतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला. 'दुर्घटनास्थळी आम्ही गेल्यावर तिथे गर्दी होते. पोलीस बंदोबस्तस वाढवला जातो. याचा परिणाम तिथे सुरू असलेल्या मदतकार्यावर होतो. आम्ही तिथे गेल्यावर माध्यमांशी बोलतो. त्यावेळी तिथे मदतकार्यात अडथळे येतात. ज्या ठिकाणी मदतकार्य वेगानं व्हायला हवं, त्याच गोष्टीला व्हीआयपींच्या भेटीमुळे उशीर होतो,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.एखाद्या परिसरात दुर्घटना घडल्यास तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतात. मदतकार्य वेगानं होईल यासाठी प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांत रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडल्या. त्यावेळी तिथले पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री जिल्ह्यातील प्रशासनाशी संपर्क साधून मदतीचा आढावा घेतात. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात. जनरलनं वॉर रुममध्ये राहून काम करायचं असतं. इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही सध्या याच पद्धतीनं काम करत आहेत, असं आदित्य यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे