शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Coronavirus: गरीब, गरजूंना केंद्राने थेट बँकेत पैसे पाठवावेत; काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 05:30 IST

यामुळे दशलक्षावधी लोकांच्या यातनांवर फुंकरच बसेल, असे नाही, तर आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेही ते चांगले असेल. कारण त्याचे अर्थव्यवस्थेवर अनेक अंगांनी परिणाम होतील, असेही अधिर रंजन चौधरी यांनी या पत्रात म्हटले.

नवी दिल्ली : सध्या कोरोना महामारीमुळे वेगवेगळ्या राज्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब, रोजंदारीवर काम करणारे आणि कमकुवत घटक देत असलेल्या अत्यंत कठीण परिस्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. महामारी आणि लॉकडाऊनमुळे या लोकांचे रोजगार गेले. उत्पन्न घटले. पर्यायाने त्यांच्यासमोर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि लोक लेखा समितीचे अध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी लिहिलेल्या पत्रात म्हटले.

वेगवेगळ्या राज्यांतील गरीब आणि गरजूंना सध्याच्या लॉकडाऊन दिवसांत थेट रोख पैसे पाठविण्याचा चौधरी यांच्या या पत्राचा विषय आहे. चौधरी त्यात म्हणतात की, “प्रतिकूल परिस्थितीमुळे या लोकांची परिस्थिती शोचनीय बनली असून, ते स्वत:ला पूर्णपणे निराधार आणि कोणतीही आशा शिल्लक राहिलेली नाही, असे समजत आहेत.  काँग्रेसच्या अध्यक्षांनी गरजूंना विनामूल्य धान्य आणि रोजगार नसलेल्या सर्वांना दरमहा सहा हजार रुपये द्यावेत, अशी सूचना केलीआहे.” सध्याच्या महामारीत गरीब आणि शोषित वर्गाची परिस्थिती विचारात घेता, सुरुवात म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊन असलेल्या सर्व राज्यांत (पश्चिम बंगालसह) सगळ्या पात्र लोकांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याच्या काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेवर आपण गांभीर्याने विचार करावा, अशी मी आपणालाविनंती करीन. यामुळे दशलक्षावधी लोकांच्या यातनांवर फुंकरच बसेल, असे नाही, तर आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेही ते चांगले असेल. कारण त्याचे अर्थव्यवस्थेवर अनेक अंगांनी परिणाम होतील, असेही अधिर रंजन चौधरी यांनी या पत्रात म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या