शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Corona vaccine : कोरोना लसींची टंचाई, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे थेट मोदींना पत्र, केली २५ लाख डोसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 11:02 IST

coronavirus: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमधून कोरोनाच्या लसीची टंचाई निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (corona virus) कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमधून कोरोनाच्या लसीची टंचाई निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. (Corona vaccine )आंध्र प्रदेशमध्येही कोरोनाच्या लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ( Shortage of corona vaccine, Andra Pradesh CM YS Jaganmohan Reddy writes letter to Modi, demands 25 lakh doses)आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाला एक पत्र लिहिले असून, या पत्रामधून जगनमोहन रेड्डी यांनी ११ ते १४ एप्रिलदरम्यान होणाऱ्या लस उत्सवासाठी कोरोनावरील लसींचे २५ लाख डोस उपलब्ध करून देण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना देण्याची विनंती केली आहे. या पत्रात जगनमोहन रेड्डी लिहितात की, सध्या आंध्र प्रदेशमध्ये कोरोनावरील लसीचे केवळ २ लाख डोस उपलब्ध आहेत. तर अजून २ लाख डोस शुक्रवारी मिळतील. त्यामुळे ११ एप्रिलपासून होणाऱ्या लस उत्सवासाठी आंध्र प्रदेशला २५ लाख डोसची तात्काळ आवश्यकता आहे.  कोरोनाचे व्यवस्थापन आणि लसीकरणाबाबत काल झालेल्या व्हिडिओ कॉन्फ्रन्सदरम्यान झालेल्या चर्चेबाबत काही महत्त्वपूर्ण मुद्दे मी उपस्थित करू इच्छितो. आंध्र प्रदेश तुम्ही दिलेल्या टेस्ट, ट्रॅक आणि ट्रेसच या त्रिसुत्रीचे दृढतेने पालन करत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तुम्ही केलेले मार्गदर्शन आणि नेतृत्वाचे संपूर्ण जग कौतुक करत आहे. मी आंध्र प्रदेशमधील कोरोना रोखण्यासाठीच्या व्यवस्थेबाबत तुमचे आभार मानतो, असेही जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

 यावेळी लस उत्सव हे अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले. ११ ते १४ एप्रिलदरम्यान लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन तुम्ही केले आहे. लस घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठीचे हे आवश्यक पाऊल आहे. गावागावातील कुठलीही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही व्यवस्था करणार आहोत, असे आश्वासनही जगनमोहन रेड्डी यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी