शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

Corona vaccine: प्रियांका गांधींचा  लसीवरून केंद्र सरकारवर 'हल्लाबोल' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:09 IST

Priyanka Gandhi News: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारीही मोर्चा सांभाळत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - सर्व प्रकारे प्रयत्न करूनही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला लागलेला डाग मिटताना दिसत नाही. राज्यातील कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, लसीचा तुटवडा आणि कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचे मृत्यू होत असल्यावरून सोशल मीडियावर लोक राज्य सरकारवर हल्ले चढवीत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारीही मोर्चा सांभाळत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला.राज्यभरातून आलेल्या तक्रारीनुसार काही जिल्ह्यात एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे दोन डोस दिले जात आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये अशा २० घटना समोर आल्या आहेत. त्यांना पहिला डोस कोव्हॅक्सिनचा आणि दुसरा डोस कोविशिल्डचा देण्यात आला. यावर कहर म्हणजे मेरठनजीकच्या शामलीत एका परिचारिकेने काही महिलांना एकाचवेळी दोन्ही डोस दिले.असाच प्रकार कानपूरमध्येही घडला असून, तेथे एकाला कोविड लसीऐवजी ॲन्टीरेबिजचे इंजेक्शन देण्यात आले.या सर्व मुद्यांवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारला घेरत, याला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे. लस उत्पादनात सर्वात अग्रणी असलेला भारत मागे कसा राहिला, याला जबाबदार कोण? केंद्र सरकार मागच्या वर्षापासूनच लसीकरण मोहिमेच्या तयारीत होते. राज्यातील कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, लसीचा तुटवडा आणि कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचे मृत्यू होत आहेत. जानेवारी २०२१ मध्ये फक्त एक कोटी साठ लाख लसीची मागणी का नोंदण्यात आली. मोठ्या प्रमाणावर विदेशात लस का निर्यात करण्यात आली? या सर्व मुद्यांवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारला घेरत, याला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांनी सरकारकडून उत्तर मागितले आहे. तसेच त्यांनी आपले प्रश्न सोशल मीडियावरही पोस्ट करून लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPriyanka Gandhiप्रियंका गांधीCentral Governmentकेंद्र सरकार