शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीत वादाची ठिणगी, राहुल गांधींवरील टीकेवरून काँग्रेस-आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोप

By बाळकृष्ण परब | Updated: November 16, 2020 11:39 IST

Bihar Assembly Election 2020 : आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

ठळक मुद्देतेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावाशिवानंद तिवारी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेतही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिल्यानंतर महाआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. तिवारी यांच्या टीकेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आरजेडीला आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला आहे.शिवानंद तिवारी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे.बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्द्यावरून आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर अनेक आरोप केले होते. बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असा आरोपही तिवारी यांनी केला.  महाआघाडीसाठी काँग्रेस ही  बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती, असेही शिवानंद तिवारी म्हणाले होते.दरम्यान, शिवानंद तिवारी यांच्या टीकेनंतर भाजपाचे नेते गिरिराज सिंह यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. बिहारमधील महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी सांगितले की राहुल गांधी नॉन सिरियस पर्यटक नेते आहेत. शिवानंद तिवारी राहुल गांधी यांना ओबामांपेक्षा अधिक ओळखू लागले आहेत. मग काँग्रेस अजूनही गप्प का? असा चिमटा त्यांनी काढला होता.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल