शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसच ठरविणार - भाई जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 05:44 IST

Mumbai News : एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले. 

मुंबई : काँग्रेस मोठा परिवार आहे. त्यामुळे भांड्याला भांड लागणे स्वाभाविक होते. पण, मागच्या काळात अंतर्गत मतभेद आता बाजूला सारत सर्वजण एकत्र येत आहोत. एखाद्या मतदारसंघात अजून काही अडचणी असल्या तरी त्यावर आमच्याकडे तोडगा आहे. एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले. विभागीय काँग्रेसमधील नेतृत्व बदलानंतर अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या संपर्क अभियानाचा पहिला टप्पा रविवारी पार पडला. रविवारी दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यांनी सर्व सहा लोकसभा मतदारसंघातील मेळावे पार पडले. विशेष, म्हणजे अंतर्गत मतभेद बाजूला सारत गटांच्या नेत्यांनी आपापल्या भागातील मेळाव्यांना हजेरी लावली. रविवारी, सकाळी दक्षिण मुंबईतील कार्यक्रमास जगताप आणि सप्रा यांच्यासह माजी मंत्री मिलिंद देवरा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड, आमदार अमीन पटेल आदी नेते उपस्थित होते. तर, सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमास संजय निरूपम, सुरेश शेट्टी आदी नेत्यांनी उपस्थिती लावली.   आगामी काळात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही जगताप यांनी दिला. येत्या काळात स्थानिक समित्यांवरील नियुक्त्या करताना मुंबई काँग्रेसमध्ये चर्चा केल्याशिवाय निर्णय होणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.  मुंबईत काँग्रेस आमदारांची संख्या दोन आकडी झाली की राज्यात आणि सहा खासदार निवडून आले तेंव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येते. ही सत्ता पुन्हा आणायची असेल तर महापालिकेची लढाईची तयारी आतापासुन सुरू करावी लागेल, असे जगताप म्हणाले. 

पदयात्रा सुरु करणार  आगामी काळात मुंबईतील सर्व जिल्ह्यांमधून पदयात्रांना सुरुवात करणार असल्याचे चरणसिंग सप्रा यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांमध्ये हात घातला पाहिजे. त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. काँग्रेसची विचारधारा लोकांना पटवून द्यायला हवी, असे सप्रा म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापMumbaiमुंबई