शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसच ठरविणार - भाई जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 05:44 IST

Mumbai News : एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले. 

मुंबई : काँग्रेस मोठा परिवार आहे. त्यामुळे भांड्याला भांड लागणे स्वाभाविक होते. पण, मागच्या काळात अंतर्गत मतभेद आता बाजूला सारत सर्वजण एकत्र येत आहोत. एखाद्या मतदारसंघात अजून काही अडचणी असल्या तरी त्यावर आमच्याकडे तोडगा आहे. एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले. विभागीय काँग्रेसमधील नेतृत्व बदलानंतर अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या संपर्क अभियानाचा पहिला टप्पा रविवारी पार पडला. रविवारी दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यांनी सर्व सहा लोकसभा मतदारसंघातील मेळावे पार पडले. विशेष, म्हणजे अंतर्गत मतभेद बाजूला सारत गटांच्या नेत्यांनी आपापल्या भागातील मेळाव्यांना हजेरी लावली. रविवारी, सकाळी दक्षिण मुंबईतील कार्यक्रमास जगताप आणि सप्रा यांच्यासह माजी मंत्री मिलिंद देवरा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड, आमदार अमीन पटेल आदी नेते उपस्थित होते. तर, सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमास संजय निरूपम, सुरेश शेट्टी आदी नेत्यांनी उपस्थिती लावली.   आगामी काळात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही जगताप यांनी दिला. येत्या काळात स्थानिक समित्यांवरील नियुक्त्या करताना मुंबई काँग्रेसमध्ये चर्चा केल्याशिवाय निर्णय होणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.  मुंबईत काँग्रेस आमदारांची संख्या दोन आकडी झाली की राज्यात आणि सहा खासदार निवडून आले तेंव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येते. ही सत्ता पुन्हा आणायची असेल तर महापालिकेची लढाईची तयारी आतापासुन सुरू करावी लागेल, असे जगताप म्हणाले. 

पदयात्रा सुरु करणार  आगामी काळात मुंबईतील सर्व जिल्ह्यांमधून पदयात्रांना सुरुवात करणार असल्याचे चरणसिंग सप्रा यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांमध्ये हात घातला पाहिजे. त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. काँग्रेसची विचारधारा लोकांना पटवून द्यायला हवी, असे सप्रा म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापMumbaiमुंबई