शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसच ठरविणार - भाई जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 05:44 IST

Mumbai News : एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले. 

मुंबई : काँग्रेस मोठा परिवार आहे. त्यामुळे भांड्याला भांड लागणे स्वाभाविक होते. पण, मागच्या काळात अंतर्गत मतभेद आता बाजूला सारत सर्वजण एकत्र येत आहोत. एखाद्या मतदारसंघात अजून काही अडचणी असल्या तरी त्यावर आमच्याकडे तोडगा आहे. एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले. विभागीय काँग्रेसमधील नेतृत्व बदलानंतर अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या संपर्क अभियानाचा पहिला टप्पा रविवारी पार पडला. रविवारी दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यांनी सर्व सहा लोकसभा मतदारसंघातील मेळावे पार पडले. विशेष, म्हणजे अंतर्गत मतभेद बाजूला सारत गटांच्या नेत्यांनी आपापल्या भागातील मेळाव्यांना हजेरी लावली. रविवारी, सकाळी दक्षिण मुंबईतील कार्यक्रमास जगताप आणि सप्रा यांच्यासह माजी मंत्री मिलिंद देवरा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड, आमदार अमीन पटेल आदी नेते उपस्थित होते. तर, सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमास संजय निरूपम, सुरेश शेट्टी आदी नेत्यांनी उपस्थिती लावली.   आगामी काळात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही जगताप यांनी दिला. येत्या काळात स्थानिक समित्यांवरील नियुक्त्या करताना मुंबई काँग्रेसमध्ये चर्चा केल्याशिवाय निर्णय होणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.  मुंबईत काँग्रेस आमदारांची संख्या दोन आकडी झाली की राज्यात आणि सहा खासदार निवडून आले तेंव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येते. ही सत्ता पुन्हा आणायची असेल तर महापालिकेची लढाईची तयारी आतापासुन सुरू करावी लागेल, असे जगताप म्हणाले. 

पदयात्रा सुरु करणार  आगामी काळात मुंबईतील सर्व जिल्ह्यांमधून पदयात्रांना सुरुवात करणार असल्याचे चरणसिंग सप्रा यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांमध्ये हात घातला पाहिजे. त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. काँग्रेसची विचारधारा लोकांना पटवून द्यायला हवी, असे सप्रा म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापMumbaiमुंबई