शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

हिंसा नकाे, आंदोलन शांततेत करण्याचे काँग्रेसचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 06:46 IST

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर केली टीका

शीलेश शर्मानवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर टीका करताना काँग्रेसने आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. राहुल गांधी यांनी हिंसाचाराबाबत ट्विट करताना म्हटले की, ‘हिंसा कुठल्याही समस्येचे समाधान नाही. दुखापत कुणालाही होऊ शकते, पण नुकसान मात्र आपल्या देशाचेच होईल. देशहितासाठी कृषीविरोधी कायदे परत घ्या.’

राहुल गांधी यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले, ‘दिल्लीचे दृश्य चकित करणारे होते. काही लोकांनी केलेली हिंसा स्वीकार्य नाही. त्यामुळे शांतीपूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी कमावलेल्या इभ्रतीवर वाईट प्रभाव होईल. शेतकरी नेत्यांनी यापासून स्वत:ला वेगळे केले आणि ट्रॅक्टर रॅलीला वाऱ्यावर सोडले. कॅप्टन यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की दिल्ली सोडावी आणि सीमेवर आपल्या आंदोलन स्थळी पोहचावे.’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी हिंसा चुकीची असल्याचे सांगत यासाठी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जर तिन्ही काळे कायदे परत घेतले असते तर ही घटना घडली नसती. त्यांनी तिन्ही कृषी कायदे शक्य तेवढ्या लवकर परत घेण्याचा सल्ला दिला. काँग्रेस, राकाँसह अन्य पक्षांनी हिंसाचाराचा निषेध केला, पण यासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले.

ममतांचा केंद्राला दोषप. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी दिल्लीतील हिंसाचाराबद्दल केंद्र सरकारलाच दोष दिला. केंद्राची ताठर भूमिका आणि शेतकऱ्यांबद्दलची उदासीन वृत्ती यामुळेच हा प्रकार घडला, असे त्या म्हणाल्या. सरकारने आता त्वरित शेतकऱ्यांशी बोलणी करून नवीन कायदे मागे घ्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदी