शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हिंसा नकाे, आंदोलन शांततेत करण्याचे काँग्रेसचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 06:46 IST

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर केली टीका

शीलेश शर्मानवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर टीका करताना काँग्रेसने आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. राहुल गांधी यांनी हिंसाचाराबाबत ट्विट करताना म्हटले की, ‘हिंसा कुठल्याही समस्येचे समाधान नाही. दुखापत कुणालाही होऊ शकते, पण नुकसान मात्र आपल्या देशाचेच होईल. देशहितासाठी कृषीविरोधी कायदे परत घ्या.’

राहुल गांधी यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले, ‘दिल्लीचे दृश्य चकित करणारे होते. काही लोकांनी केलेली हिंसा स्वीकार्य नाही. त्यामुळे शांतीपूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी कमावलेल्या इभ्रतीवर वाईट प्रभाव होईल. शेतकरी नेत्यांनी यापासून स्वत:ला वेगळे केले आणि ट्रॅक्टर रॅलीला वाऱ्यावर सोडले. कॅप्टन यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की दिल्ली सोडावी आणि सीमेवर आपल्या आंदोलन स्थळी पोहचावे.’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी हिंसा चुकीची असल्याचे सांगत यासाठी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जर तिन्ही काळे कायदे परत घेतले असते तर ही घटना घडली नसती. त्यांनी तिन्ही कृषी कायदे शक्य तेवढ्या लवकर परत घेण्याचा सल्ला दिला. काँग्रेस, राकाँसह अन्य पक्षांनी हिंसाचाराचा निषेध केला, पण यासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले.

ममतांचा केंद्राला दोषप. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी दिल्लीतील हिंसाचाराबद्दल केंद्र सरकारलाच दोष दिला. केंद्राची ताठर भूमिका आणि शेतकऱ्यांबद्दलची उदासीन वृत्ती यामुळेच हा प्रकार घडला, असे त्या म्हणाल्या. सरकारने आता त्वरित शेतकऱ्यांशी बोलणी करून नवीन कायदे मागे घ्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदी