शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोनिया गांधी संवाद साधणार; उद्धव ठाकरेही सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:29 IST

राज्यसभेत झालेल्या प्रकारानंतर आज दिल्लीत विरोधकांनी संसदेपर्यंत मोर्चा काढला.

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सर्वसाधारण विमा सुधारणा विधेयकावर चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी विधेयकाची प्रत फाडून खुर्चीत फेकली त्यावरुन गदारोळ झाला. यावेळी राज्यसभेत मार्शलला पाचारण करण्यात आले. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

राज्यसभेत झालेल्या प्रकारानंतर आज दिल्लीत विरोधकांनी संसदेपर्यंत मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, विरोधकांची एकजूट आहे. २० ऑगस्टला सोनिया गांधी काँग्रेसच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही(CM Uddhav Thackeray)या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती राऊतांनी दिली. 

 

तसेच राज्यसभेत जी घटना घडली त्यावर संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. विरोधकांना घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे का? जेष्ठ नेते मल्लिकाजुर्न खरगे यांच्या चेंबरमध्ये विरोधकांची बैठक पार पडली. मार्शलच्या वेषात महिला खासदारांवर हल्ला केला गेला. जे लोक सभागृहात उभे होते ते पाहून पाकिस्तान बोर्डावर उभे असल्याचं वाटलं. ही संसदीय लोकशाहीची हत्या आहे. विरोधकांवर जितका हल्ला कराल तितक्या ताकदीने विरोधक पुढे येऊन तुमच्याशी लढतील. बाहेरच्या लोकांना मार्शल बनवून उभं केलं होतं असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे. 

राज्यसभेत काय घडलं?संविधान (१२७ वी दुरुस्ती) विधेयक, २०२१ सभागृहात मंजूर झाल्यावर साधारण विमा व्यवसाय (ष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावर आसनाच्या परवानगीने चर्चा सुरू झाली. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. साधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे, अशी मागणी करत गोंधळ घातला. परंतु गोंधळात सरकारने हे विधेयक मंजूर केले. 

सरकारच्यावतीने दावा करण्यात आला की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातील मार्शल आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारवर विरोधी खासदारांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्या १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर विमा संबंधी विधेयक मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज संध्याकाळी ७.०४ पर्यंत अर्धा तास तहकूब करण्यात आले. गोंधळ घालणारे खासदार सभापतींच्या आसनाच्या अगदी जवळ आले आणि त्यांनी कागदपत्रे फाडली आणि हवेत आसनाकडे फेकून दिली.

हा लोकशाहीवर हल्ला - शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "आपल्या ५५ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत (राज्यसभेत)महिला खासदारांवर ज्या प्रकारे हल्ला झाला आहे, ते कधीही पाहिले नाही. ४० हून अधिक महिला आणि पुरुषांना बाहेरून सभागृहात आणण्यात आले. हे वेदनादायक आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतRajya Sabhaराज्यसभा