शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

वर्ध्यात काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण; तडस यांची उमेदवारी निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:47 IST

गेल्या साडेचार वर्षांच्या काळात जिल्हा परिषद, नगर पालिकांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपने मुसंडी मारली.

- अभिनय खोपडेवर्धा लोकसभा मतदार संघात गेल्या वेळी काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा पराभव करून भाजपाचे रामदास तडस निवडून आले होते. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात जिल्हा परिषद, नगर पालिकांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपने मुसंडी मारली. या मतदारसंघात काँग्रेसचे तीन व भाजपचे तीन आमदार आहेत. मात्र काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी असून, दस्तुरखुद्द राहुल गांधी यांच्या सभेनंतरही पक्षातील गटबाजी थांबलेली नाही. काँग्रेसकडून चारुलता खजानसिंग टोकस, शैलेश अग्रवाल या दोघांनी उमेदवारी मागितली आहे. टोकस या माजी मंत्री दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत. सध्या त्या दिल्लीनजीकच्या गुडगाव येथे राहतात. गेल्या वेळी दत्ता मेघे यांच्यासारखे बलाढ्य नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होते. आता मेघे पिता-पुत्र भाजपवासी झाले आहेत. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस पुन्हा उमेदवार राहतील, अशी दाट शक्यता आहे. सागर मेघे यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.सिंदी येथील ड्रायपोर्ट, वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे व नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याने ग्रामीण भागात भाजपविषयी नाराजी आहे. काँग्रेस-भाजपशिवाय या मतदारसंघात मागील दीड वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हेही कामाला लागले आहेत. त्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेस-राकाँ आघाडीत हा मतदारसंघ स्वाभिमानला सोडण्याबाबत हालचाली सुरू आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या दिल्लीस्थित नेत्यांकडे उमेदवारीसाठी नवखे असलेले शैलेश अग्रवाल ठाण मांडून आहेत.हिंदीभाषिक मतदार या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे ते उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत. यापूर्वी चारदा या मतदार संघातून हिंदीभाषिक खासदार निवडून गेले आहेत. याव्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आदींचेही उमेदवार रिंगणार राहणार आहेत. मात्र, खरा सामना भाजप व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारातच होईल, हे निश्चित!वर्धा मतदारएकूण मतदार- 17,95,495पुरुष- 8,83,887महिला- 8,38,493सध्याची परिस्थितीजिल्ह्यातील आठ नगरपालिका-पंचायतीत १०४ सदस्य असून, भाजपचे ५८, कॉँग्रेसचे ३०, राष्टÑवादीचे ६, सेनेचे ४ व इतर ६ सदस्य आहेत. सर्वच पालिकांवर भाजपची सत्ता आहे.जिल्हा परिषदेवरही भाजपची एकहाती सत्ता असून, ५२ पैकी ३१ सदस्य भाजपचे आहेत. तर १३ कॉँग्रेस, दोन राकॉँ, सेना दोन व अन्य चार सदस्य आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अनेक गट आहेत. जिल्हा सहकारी बँक डबघाईस आल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजपने या बँकेला नवसंजीवनी देण्याचे काम केले. त्यामुळे बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण होणार आहे. हाही निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपकडे दत्ता मेघे यांची शक्ती वाढल्याने, या मतदार संघात काँग्रेससमोर तगडे आव्हान भाजपचे आहे.२०१४ मध्ये मिळालेली मतेरामदास तडस (भाजप)- 5,37,518सागर मेघे (काँग्रेस)- 2,15,783चेतन पेंदाम (बसप)- 90,866मो. अलीम पटेल (आप)- 15,719श्रीकृष्ण चंपत उबाळे (अपक्ष)- 6,394

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपा