शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Farm Laws: कृषी कायदे मागे घ्या; राहुल गांधीची मागणी, ट्रॅक्टर चालवत संसदेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:10 IST

Farm Laws: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी चक्क ट्रॅक्टरवरून संसदेत आल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली: गेल्या आठ महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसनेही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. सरकार चर्चेसाठी तयार असले, तरी शेतकरी कृषी कायदे रद्दच झाले पाहिजेत, या मागणीवर ठाम आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी चक्क ट्रॅक्टरवरून संसदेत आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, पोलिसांनी कारवाई करत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बी. व्ही. श्रीनिवास यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. (congress rahul gandhi came in parliament by driving tractor for support to farm laws repeal)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळी सोमवारी सकाळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी चक्क ट्रॅक्टर चालवत आल्याचे दिसले. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, दीपेंद्र हुड्डा यांसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांच्या हातात कृषी कायदे मागे घेण्याविषयी फलक होते. मात्र, संसद परिसरातून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बी. व्ही. श्रीनिवास यांना ताब्यात घेण्यात आले. 

लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

हा शेतकऱ्यांचा आवाज आहे

 हा शेतकऱ्यांचा आवाज आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाहीए. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील. हे काळे कायदे आहेत. शेतकऱ्यांवर खोटे आरोप केले जात आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांना दहशतवादी म्हटले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. तर, दुसरीकडे केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची जंतरमंतरवर निदर्शने सुरू आहेत. दररोज २०० शेतकरी इथे येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारत आहेत. ९ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

दरम्यान, कोरोना लसीकरणावरून राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. कुठे आहे लस? असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल विचारला आहे. देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. तसेच देशातील कोरोना लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि मीडियातील बातमीचा उल्लेख करत एक व्हिडिओही राहुल यांनी शेअर केला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनPoliticsराजकारणParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस