शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Farm Laws: कृषी कायदे मागे घ्या; राहुल गांधीची मागणी, ट्रॅक्टर चालवत संसदेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:10 IST

Farm Laws: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी चक्क ट्रॅक्टरवरून संसदेत आल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली: गेल्या आठ महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसनेही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. सरकार चर्चेसाठी तयार असले, तरी शेतकरी कृषी कायदे रद्दच झाले पाहिजेत, या मागणीवर ठाम आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी चक्क ट्रॅक्टरवरून संसदेत आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, पोलिसांनी कारवाई करत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बी. व्ही. श्रीनिवास यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. (congress rahul gandhi came in parliament by driving tractor for support to farm laws repeal)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळी सोमवारी सकाळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी चक्क ट्रॅक्टर चालवत आल्याचे दिसले. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, दीपेंद्र हुड्डा यांसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांच्या हातात कृषी कायदे मागे घेण्याविषयी फलक होते. मात्र, संसद परिसरातून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बी. व्ही. श्रीनिवास यांना ताब्यात घेण्यात आले. 

लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

हा शेतकऱ्यांचा आवाज आहे

 हा शेतकऱ्यांचा आवाज आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाहीए. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील. हे काळे कायदे आहेत. शेतकऱ्यांवर खोटे आरोप केले जात आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांना दहशतवादी म्हटले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. तर, दुसरीकडे केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची जंतरमंतरवर निदर्शने सुरू आहेत. दररोज २०० शेतकरी इथे येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारत आहेत. ९ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

दरम्यान, कोरोना लसीकरणावरून राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. कुठे आहे लस? असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल विचारला आहे. देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. तसेच देशातील कोरोना लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि मीडियातील बातमीचा उल्लेख करत एक व्हिडिओही राहुल यांनी शेअर केला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनPoliticsराजकारणParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस