शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

'या' तीन कायद्यांच्या माध्यमातून मोदी शेतकऱ्यांचा गळा कापत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 19:00 IST

या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल, असे राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi,Punjab )

नवी दिल्ली - संसदेच्या पवसाळी अधिवेशनात पास झालेल्या तीन कृषी कायद्यांसंदर्भात काँग्रेससह जवळपास सर्वच विरोधक केंद्रातील मोदी सरकारचा जोरदार विरोध करत आहेत. सध्या काँग्रेस पंजाबमध्ये 'ट्रॅक्टर यात्रा' काढत आहे. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीदेखील सहभागी होत आहेत. सोमवारी पंजाबमधील भवानीगड येथून समानापर्यंत ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली.

'आपली शेती वाचवा' यात्रेपूर्वी राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेली त्यांनी केंद्रावर जबरदस्त हल्ला चढवला. गांधी म्हणाले, "हे सरकार गेल्या सहा वर्षांपासून गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक आक्रमण करत आहे. यांची एकही नाही अशी नाही, की जिचा गरिबांना फायदा होईल."

राहुल गांधी म्हणाले, "नोटाबंदीनंतर जिएसटी कायदा आणला, आता तुम्ही कुण्याही एखाद्या छोट्या दुकानदाराला अथवा व्यापाऱ्याला विचारा, जीएसटीमुळे काय झाले. अद्यापही छोट्या दुकानदाराला अथवा व्यापाऱ्याला जीएसटी समजलेला नाही."

एवढी घाई कशाची होती?शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत."

"या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

आता काँग्रेस मागे हटणार नाही. मोदीजी आपल्याला शेतकऱ्यांची शक्ती ओळखावी लागेल. आता हे शेतकरी आणि मजूर कोरोनाला घाबरून घरात बसणार नाहीत, ते रस्त्यावर उतरतील आणि या कायद्यांचा विरोध करतील. यानंतर राहुल गांधींची ट्रॅक्टर यात्रा समाना येथे पोहोचली. मात्र, येथे अपेक्षेप्रमाणे लोक उपस्थित नव्हते. यावेळी राहुल गांधींच्या भाषणादरम्यान रिकाम्या खुर्च्याही दिसून आल्या. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाबFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी