शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 20:11 IST

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून (Corona Vaccine) मोदी सरकारवर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. "मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट" अस म्हणत प्रियंका यांनी बोचरी टीका केली आहे. 

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "डेल्टा प्लस व्हेरिएंट देशात दाखल झाला आहे. मात्र आत्तापर्यंत फक्त 3.6 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. पण पंतप्रधान मात्र इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसत आहेत. मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये तब्बल 40 टक्क्यांची घट झाली आहे" असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारच्या विक्रमी लसीकरणाचा फॉर्म्युला असं म्हणत मध्य प्रदेशमधील आकडेवारी देखील दिली आहे.

"विक्रमी लसीकरणाचा फॉर्म्युला... मध्य प्रदेश 20 जून – 692 नागरिकांना लसीकरण. 21 जून – 16 लाख 91 हजार 967 जणांना लसीकरण. 22 जून – 4 हजार 825 नागरिकांना लसीकरण. लसी जमा केल्या, इव्हेंटसाठी एका दिवसात लसी दिल्या आणि पुन्हा पुढच्या दिवशी लसीकरण कमी झालं. डिसेंबरपर्यंत सगळ्यांना लस देण्यासाठी देशात दररोज 80 ते 90 लाख लोकांचं लसीकरण करायला हवं" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी कोरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार आहे तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला होता.

"केंद्र सरकार भारतातील तीन टक्के लोकसंख्येचंही लसीकरण पूर्ण करू शकलेलं नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारने लस वितरण व्यवस्था आणखीन मजबूतीनं आपल्या हाती घेण्याची गरज होती, मात्र या वेळेस सरकारने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि लस वितरणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली" असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला होता. तसेच "सरकारकडून डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु, यासाठी प्रत्येक दिवशी 70-80 लाख लसीचे डोस देण्याची कोणतीही योजना सरकारनं देशासमोर ठेवलेली नाही. कोरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार असेल तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का?" असा शब्दांत प्रियंका यांनी निशाणा साधला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेश