शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Narendra Modi Exclusive Interview: काँग्रेस हा तर केवळ एका कुटुंबाचाच पक्ष - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 07:38 IST

विशेष मुलाखत - काँग्रेस पक्ष एकाच कुटुंबासाठी आणि कुटुंबाकडून चालविला जाणारा पक्ष आहे. घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व एका कुटुंबासाठी असते. खासगी कंपनीच्या अविर्भावात ते पक्ष चालवत असतात

ऋषी दर्डा, संपाकदीय संचालक, लोकमत

यदु जोशी, वरिष्ठ सहायक संपादक

मुंबई : काँग्रेस पक्ष एकाच कुटुंबासाठी आणि कुटुंबाकडून चालविला जाणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देसम, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष या सर्वांची स्थितीही तशीच आहे. पण भाजपचा पुढील अध्यक्ष कोण असेल, हे तुम्ही-आम्ही सांगू शकत नाही. अन्य पक्ष व भाजप यांच्यात हाच फरक आहे. घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व एका कुटुंबासाठी असते. खासगी कंपनीच्या अविर्भावात ते पक्ष चालवत असतात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या घाईगडबडीत शुक्रवारच्या मुंबई दौऱ्यात देशातील सर्वाधिक खपाच्या लोकमत या मराठी दैनिकाला सविस्तर मुलाखत दिली. लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा व वरिष्ठ सहाय्यक संपादक यदु जोशी यांच्या अडचणींच्या प्रश्नांनाही त्यांनी दिलखुलास व सविस्तर उत्तरे दिली. 

देशात प्रथमच सरकारच्या बाजूने लाट दिसत आहे. लोक आमच्या कामावर समाधानीच नव्हे, तर खुश आहेत. तेच आम्हाला पुन्हा निवडून देऊ इच्छित आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चितच आहे, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले की आपल्याला बहुमत मिळेल, असे विरोधकही बोलायला तयार नाही. आमच्या जागा गेल्या वेळेपेक्षा, २0१४ पेक्षा अधिक येतील, एवढेच ते सांगत आहेत. त्यांच्या मुलाखतीचा हा सारांश.

  • साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून दिलेली उमेदवारी आणि त्यांचे विधान यावरून भाजपवर बरीच टीका होत आहे. या बद्दल आपले मत काय?

साध्वींना दिलेली उमेदवारी हा मुळात वादाचा मुद्दा नाहीच. वसुधैव कुटुंबकम् अशी भारताची पाच हजार वर्षांची प्राचीन संस्कृती बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असतो. जगाला बौद्धिक आणि वैज्ञानिक ज्ञान देणाºया या संस्कृतीला कमी लेखण्याचे कुटील काम काँग्रेसने मतांसाठी केले. त्यामुळे प्रज्ञासिंह यांची उमेदवारी ही काँग्रेसने केलेल्या या पापाचा जाब विचारण्यासाठी आहे.

  • नोटाबंदी यशस्वी झाली असे आपल्याला वाटते का? की त्यात काही चुका झाल्या?

काळ्या पैशाविरुद्धच्या लढ्यात आम्हाला चांगले यश मिळाले. गेल्या साडेचार वर्षांत आम्ही काळ्या पैशाविरुद्ध जी पाऊले उचलली त्यामुळे १.३० लाख कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न समोर आले. तसेच सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणि जप्ती आली. ६ हजार ९०० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्ता आणि १६०० कोटी रुपयांच्या परकीय मालमत्ता ही जप्तीखाली आल्या आहेत. या खेरीज, ३.३८ लाख ‘शेल’ कंपन्यांचा छडा लावून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. नोटाबंदीसारख्या उपाययोजनांचाच परिणाम म्हणून आता करदात्यांची संख्या आता दुप्पट झाली आहे. नोटाबंदी अत्यंत परिणामकारक ठरली. पण विरोधकांचे म्हणाल तर नोटाबंदीमुळे त्यांचा बराच माल गेल्यामुळे त्यांच्याकडून टीका होणे स्वाभाविक आहे.

  • सीएमआयईच्या अहवालानुसार बेरोजगारीचे प्रमाण २०१९ मध्ये ७.२ टक्के इतके आहे. बेरोजगारीचा प्रश्न आपण कसा हाताळणार?

आपल्या प्रश्नाचा पहिला भाग चुकीचा आहे. रोजगाराबाबत गेल्या पाच वर्षांत युवकांसाठीच्या संधींमध्ये कितीतरी वाढ झाली आहे. बेरोजगारीबद्दल जे काही टीकात्मक बोलले जात आहे त्याला वास्तवाचा आधार नाही. साडेचार कोटी नवउद्योजकांना मुद्रा योजनेत अर्थसहाय्य करण्यात आले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजना यामध्ये १ कोटी २० लाख सदस्यांची वार्षिक वाढ होणे यावरूनच तेवढे नवे औपचारिक रोजगार तयार झाले हे स्पष्ट होते. सीआयआयच्या सर्वेक्षणनुसार मध्यम व लघु उद्योगांमध्ये ६ कोटी नवे रोजगार चार वर्षांत तयार झाले. नॅसकॉमच्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१७ या काळात आयटी-बीपीओ, रिटेल, वस्रोद्योग व ऑटोमोटिव्ह या क्षेत्रांमध्ये १ कोटी ४० लाख रोजगारांची निर्मिती झाली.

सविस्तर मुलाखत वाचा - देशात सर्वत्र सरकारच्या बाजूनेच लाट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाDemonetisationनिश्चलनीकरण