शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही - नवज्योत सिंग सिद्धू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:45 IST

navjot singh sidhu : कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवे राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संकटात पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंजाब कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस हाय कमांडने सर्व आमदार, मंत्री आणि राज्यातील नेत्यांना दिल्लीला बोलवले आहे. या दरम्यान मंगळवारी कॉंग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिल्लीत हायकमांडकडून गठीत करण्यात आलेल्या तीन सदस्यीय पॅनलसोबत चर्चा केली. (congress leader navjot singh sidhu in delhi punjab congress rebel meet panel updates) 

नवज्योतसिंग सिद्धू यांनी या बैठकीनंतर सांगितले की, मी हायकमांडने बोलविल्यानंतर याठिकाणी आलो आहे, पंजाबमधील जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी आलो आहे. मी पंजाबचे सत्य आणि हक्काचा आवाज हायककमांडला सांगितला आहे'. याचबरोबर, माझी भूमिका अशी आहे की पंजाबमधील लोकांमध्ये लोकशाही ताकद आहे, त्यांना ती मिळायला हवी. सत्य काय आहे, ते मी संपूर्णपणे सांगून आलो आहे. सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही, आम्हाला पंजाबला जिंकायचे आहे. तसेच, प्रत्येक पंजाबविरोधी शक्तीचा पराभव होईल, असेही नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले.

दरम्यान, कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवे राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदर पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कसह निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस हायकमांडकडून यामध्ये लक्ष घातल्या जात आहे. 

मंगळवारी पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील तीन सदस्यीय पॅनलसमोर त्यांच्या समस्या मांडत आहेत. काँग्रेसच्या किमान २४-२५ आमदार ज्यात प्रदेशाध्यक्ष सुनील झाखडं, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा यांचा समावेश आहे. ते सर्व दिल्लीत दाखल झाले आहेत. निवडणुकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वादनवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पक्ष प्रभारी आशा सिंग यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप केला होता. कॅप्टन साहेब आणि आशा कुमारी यांनी मॅडम सिद्धू लोकसभेच्या उमेदावारीसाठी योग्य वाटत नाहीत. दसऱ्या दिवशी झालेल्या ट्रेन दुर्घटनेच्या आधारावर माझे तिकीट कापले गेले, असा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला होता. तर माझी बायको कधी खोटे बोलत नाही. ती नैतिकतेने मजबूत आहे, असे सांगत नवज्योत सिंग यांनी तिची पाठराखण केली होती. 

टॅग्स :PunjabपंजाबPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू