शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा!, नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 19:45 IST

Congress leader Nana Patole : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन कामाला लागावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

ठळक मुद्देगांधी भवन येथे आज नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

मुंबई : राज्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची गरज असून सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन कामाला लागावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. (Congress leader Nana Patole appeals to the activists to start working for the local body elections)

गांधी भवन येथे आज नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हांडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. हिरामन खोसकर, माजी मंत्री शोभा बच्छाव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसीचंद रेड्डी, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, शरद अहेर, भाई नगराळे, चारुलता टोकस, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस महत्वाचा घटक पक्ष आहे. कठीण परिस्थिती असतानाही सरकारने एका वर्षात जनतेसाठीचे कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीनंतरची मदत यासह कोरोना काळातही उत्तम काम केले आहे. सरकारची ही कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. तसेच केंद्रातील मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून महागाई प्रचंड वाढली आहे. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. सर्व सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत. भाजपा सरकारच्या या लोकविरोधी कारभाराला लोक कंटाळले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पक्षाची भूमिका व सरकार करत असलेले काम पोहोचवावे काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल, असा विश्वास प्रदेशाध्यांनी बोलून दाखवला.  

याचबरोबर, काँग्रेस पक्षाचा विचार हाच शाश्वत विचार असून तोच देशाला तारणारा आहे. काँग्रेस हा संविधानाला व लोकशाहीला माननारा पक्ष असून समाजातील सर्वांना ताकद देणारा पक्ष आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेत असून लोकांपर्यंत सरकारचे काम पोहोचवा. विधान परिषदेच्या निवडणुका तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून अशीच कामगिरी आगामी निवडणुकांमध्ये करण्यासाठी सज्ज रहा, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMumbaiमुंबईBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात