शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खट्टर सरकार धोक्यात, BJP-JJP चे अनेक आमदार संपर्कात, काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 14:06 IST

kumari selja claims congress is trying to form government in haryana : अनेक भाजपा आणि जेजेपीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्षांच्या या दाव्यावर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चंदीगड : शेतकरी आंदोलनामुळे हरयाणातील राजकारण चांगलेच तापले आहे. हरयाणातील खट्टर सरकार धोक्यात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. अनेक भाजपा आणि जेजेपीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हरयाणाच्या खट्टर सरकारचे असे अनेक आमदार आहेत, जे वास्तव पाहात असून आमच्या संपर्कात आहेत. ज्यावेळी परिस्थिती येईल, त्यावेळी संविधान पाहून हरयाणामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकते, असे हरयाणा काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी सांगितले.

आज जी परिस्थिती उद्भवली आहे, त्या परिस्थितीत बरेच आमदार त्याचे वास्तव जाणून घेत आहेत. मग ते सत्ताधारी पक्षातील असो किंवा सहयोगी किंवा अपक्ष, असे कुमारी शैलजा म्हणाल्या. तसेच, असे अनेक आमदार आमच्याशी बोलून आपली नाराजीही व्यक्त करत आहेत. पुढील परिस्थिती पाहून काँग्रेस निर्णय घेईल, असे कुमारी शैलजा यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षांच्या या दाव्यावर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सर्वांना माहीत आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, काँग्रेसने आपल्या आमदारांविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे.

शेतकरी आंदोलनादरम्यान भाजपा आणि जेजेपीच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत भाजपा-जेजेपीच्या नेत्यांनी अमित शहा यांना आश्वासन दिले की राज्यातील मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत अविश्वास ठराव आणला तरी युती सरकार सुरक्षित राहील.

मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी अमित शहा यांच्याशी झालेल्या एक तासाच्या बैठकीनंतर सांगितले होते की, हरयाणामधील राजकीय वातावरण एकदम ठीक आहे. राज्यात राजकीय चर्चा चालू होत्या, त्यात काही अर्थ नाही. युती सरकार पूर्ण विश्वासाने जात आहे आणि आपला कार्यकाळ पूर्ण करेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसHaryanaहरयाणाPoliticsराजकारणBJPभाजपा