शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

...म्हणून निवडणुकीची घोषणा होताच सीतारामण यांना सोडावं लागलं विशेष विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 12:56 IST

मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

चेन्नई- मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तसेच 23 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली. ही आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळेच निर्मला सीतारमण यांना स्वतःचं विशेष विमान सोडून कमर्शियल फ्लाइटनं दिल्लीत यावं लागलं. सीतारामण यांनी चेन्नईतल्या आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी सरकारी गाडीचा वापर केला नव्हता. तसेच भाजपाच्या एका नेत्याच्या गाडीतूनच त्या विमानतळावर पोहोचल्या. संरक्षण मंत्री विशेष विमानानं जाणार होत्या. परंतु त्याचदरम्यान आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आयोगानं सात टप्प्यांत लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. भारतीय जनता पार्टीच्या एका प्रसिद्धीपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सीतारामण एका खासगी कंपनीच्या विमानानं रात्री आठ वाजून 40 मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना होणार होत्या. परंतु आचारसंहितेमुळे त्यांना कमर्शियल विमानानं दिल्लीत पोहोचावं लागतं.  काय आहे आचारसंहिता?आचारसंहितेमध्ये काही अटी आणि शर्थींचं पालन करावं लागतं. यादरम्यान राजकीय नेत्यांसाठी काही नियम केले जातात. या नियमांचं राजकीय नेते आणि संभाव्य उमेदवाराला पालन करावं लागतं. केव्हा लागू होते आचारसंहिता?निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू होते. संविधान कलम 324अंतर्गत निष्पक्ष निवडणुका संपन्न होण्याचा मानस असतो. याचदरम्यान राजकीय नेते आणि उमेदवारांना नियमांचं पालन करावं लागतं. जर नियमांचं कोणीही उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९