शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

...म्हणून निवडणुकीची घोषणा होताच सीतारामण यांना सोडावं लागलं विशेष विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 12:56 IST

मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

चेन्नई- मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तसेच 23 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली. ही आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळेच निर्मला सीतारमण यांना स्वतःचं विशेष विमान सोडून कमर्शियल फ्लाइटनं दिल्लीत यावं लागलं. सीतारामण यांनी चेन्नईतल्या आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी सरकारी गाडीचा वापर केला नव्हता. तसेच भाजपाच्या एका नेत्याच्या गाडीतूनच त्या विमानतळावर पोहोचल्या. संरक्षण मंत्री विशेष विमानानं जाणार होत्या. परंतु त्याचदरम्यान आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आयोगानं सात टप्प्यांत लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. भारतीय जनता पार्टीच्या एका प्रसिद्धीपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सीतारामण एका खासगी कंपनीच्या विमानानं रात्री आठ वाजून 40 मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना होणार होत्या. परंतु आचारसंहितेमुळे त्यांना कमर्शियल विमानानं दिल्लीत पोहोचावं लागतं.  काय आहे आचारसंहिता?आचारसंहितेमध्ये काही अटी आणि शर्थींचं पालन करावं लागतं. यादरम्यान राजकीय नेत्यांसाठी काही नियम केले जातात. या नियमांचं राजकीय नेते आणि संभाव्य उमेदवाराला पालन करावं लागतं. केव्हा लागू होते आचारसंहिता?निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू होते. संविधान कलम 324अंतर्गत निष्पक्ष निवडणुका संपन्न होण्याचा मानस असतो. याचदरम्यान राजकीय नेते आणि उमेदवारांना नियमांचं पालन करावं लागतं. जर नियमांचं कोणीही उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९